शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दख्खनचे सुभेदार महाराजा करणसिंहाचे स्मारक दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:32 PM

खाम नदीच्या पश्चिमी काठावरील विद्यमान गोलवाडीच्या शिवारात बादशहा औरंगजेबाचा दख्खणचा सुभेदार महाराजा करणसिंह चिरनिद्रा घेत आहेत. इतिहासाच्या या खाणाखुणा उपेक्षित आहेत. 

- प्रशांत तेलवाडकर

कर्णपुरा परिसर ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते बिकानेरचे महाराजा करणसिंह. इ.स.१६६९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर आताच्या गोलवाडी परिसरात  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तेथे छत्री उभारण्यात आली. शहराच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या छत्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या छत्रीचे माहात्म्य कोणालाच माहीत नाही. 

औरंगजेब बादशहाने बिकानेरचे महाराजा करणसिंह यांना दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमले होते. औरंगाबादेतील खाम नदीच्या पूर्वेस कर्णपुरा गाव वसवून  करणसिंह सैन्यासह तेथे राहत होते. तेथे त्यांनी ‘राजाचा महाल’ आणि ‘राणीचा महाल’म्हणून ओळखले जाणारे दोन महालही उभारले होते. या महालालगतच महाराजांनी आपले कुलदैवत (राठोड राजपुतांचे कुलदैवत) ‘श्री करणी देवी’चे मंदिर १६६० ला स्थापन केले. या देवीलाच भाविक  कुणी ‘तुळजाभवानी’ तर कुणी ‘कर्णपुरा देवी’ म्हणून ओळखतात.

महाराजा करणसिंहांचे सैनिक देवीचे दर्शन घेऊन, शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करीत असत. कर्णपुऱ्यातील सीमोल्लंघनाची ही परंपरा आजमितीपर्यंत सुरूआहे. मंदिराचे संस्थापक  महाराजा करणसिंहांचा जन्म १० जुलै १६१६ ला झाला होता. दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमणुकीनंतर त्यांनी कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पद्यपुरा (पदमपुरा) नावाची तीन गावे वसविली होती. जी आज औरंगाबाद शहरातील वसाहती म्हणून ओळखल्या जातात.

तत्कालीन इंग्रज सरकार आणि महाराजांच्या वारसांमध्ये करार होऊन ब्रिटिश सरकारने बिकानेर सीमेलगतची बाबलरास आणि रतनखेरा ही दोन गावे महाराजांच्या वारसांना देऊन त्याच्या बदल्यात कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पदमपुरा १९०४ साली ब्रिटिशांनी घेतले होते. आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे २२ जून १६६९ पर्यंत महाराजा करणसिंह  कर्णपुऱ्यातच राहत होते. त्यावेळी ‘चुरू’चे  ठाकूर कुशलसिंह कर्णपुऱ्यातच होते. त्यांनीच करणसिंहाचा अंत्यविधी केला.

गोलवाडी परिसरात जेथे अंत्यविधी करण्यात आला त्याठिकाणी करणसिंह महाराजांचे स्मारक म्हणून दगडी छत्री बांधण्यात आली. सुमारे १५ फूट उंचीची ही गोलाकार छत्री आज एकटीच उभी आहे. या छत्रीच्या ओट्याचा काही भाग आता पडू लागला आहे. चारीबाजूने गवत वाढले आहे. रस्त्यापासून आत एका शेतात कोपऱ्यात ही छत्री असल्याने तेथपर्यंत सहजासहजी कुणी जात नसल्यामुळे ती अजून टिकून आहे. पुरातत्व विभागालाही या छत्रीची माहिती नसावी. कारण, शहरात व आसपासच्या परिसरात अशा राजा, महाराजांच्या अनेक छत्र्या आहेत. त्या  आता शेवटच्या घटका मोजत आहेत. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद