शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

मराठवाड्याच्या समस्या त्याच; राज्यकर्ते मात्र नवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 8:13 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सिंचन, पाणी, वीज, जि.प. शाळा, दळणवळण, आरोग्याच्या मुद्यांचा घेतला बारकाईने आढावा 

औरंगाबाद : मराठवाड्यातील समस्या त्याच असून, त्यात फक्त राज्यकर्ते नवे हाच बदल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागातील सिंचन, पाणी, वीजपुरवठा, जि.प. शाळा, दळणवळण, आरोग्य, तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न गरुवारी दुपारपासून रात्री ८ वाजेपर्यंत केला. 

मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरणीमंत्री आदित्य ठाकरे यांनी या विभागाचा प्रथमच वैधानिकरीत्या आढावा घेतला. जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतील विविध समस्यांबाबतची बैठक झाली. शुक्रवारी उर्वरित जिल्ह्यांतील समस्यांचा आढावा घेण्यात येईल. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३०० जि.प. शाळांवरील छत दुरुस्त करा, शिर्डीकडे जाणारा रस्ता खराब आहे, जिल्ह्यात नव्याने आरोग्य केंद्र व्हावेत. पैठण रस्ता, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत लोकप्रतिनिधींनी मुद्दे उपस्थित केले. बैठकीला सर्व प्रशासकीय यंत्रणेसह शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या बैठकीत शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्शन, एचव्हीडीएसची अपेक्षित कामे, सोलार, ट्रान्सफॉर्मरची अपूर्ण कामे, औद्योगिक वसाहत प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्य:स्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली. २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी चार टप्प्यांत निधीची तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. ५० हून अधिक मुद्यांवर उस्मानाबादच्या लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. 

परभणी जिल्ह्यातील बैठकीत अंतर्गत रस्ते,  बंधारे आणि रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, मेडिकल कॉलेज सुरू करणे, कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासह भुयारी गटार योजनेबाबत मुद्दे मांडले. 

त्याच समस्या कायम आहेतमराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, सिंचन अनुशेष, हक्काचे पाणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाययोजना, जि.प.च्या अखत्यारीत रस्त्यांची सद्य:स्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्य:स्थिती, कृषिपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषधपुरवठा, पीक विमा योजनेचे उर्वरित अनुदान, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणाऱ्या असहकार्याबाबत लोकप्रतिनिधींनी बैठकीत ओरड केली. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाUddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळbusinessव्यवसाय