शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

हक्काच्या पाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मराठवाड्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:45 IST

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, हक्काच्या पाण्यासाठी अवघ्या मराठवाड्याचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआज सुनावणी : जलतज्ज्ञांच्या मते, मराठवाड्याची बाजू कायदेशीर आणि मजबूत; फक्त योग्य मांडणीची गरज

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, हक्काच्या पाण्यासाठी अवघ्या मराठवाड्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. मराठवाड्याची बाजू कायदेशीर आणि मजबूत आहे. केवळ ती योग्यरीत्या मांडली गेली पाहिजे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.प्रारंभी तयारी करण्याच्या नावाखाली आणि नगर, नाशिक जिल्ह्यांत होणाऱ्या विरोधाचे कारण पुढे करून पाणी सोडण्यास विलंब केला गेला. या सगळ्यात जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. तीन सदस्यीय न्यायपीठ बुधवारी सुनावणी करणार आहे. त्यामुळे दोन दिवस जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे निकाल काय लागतो, याकडे मराठवाड्यासह नगर, नाशिक जिल्ह्यांतील जनतेचे लक्ष लागले आहे.गोदावरी आंतरराज्य नदी असल्याने केंद्र शासनाने लवादामार्फत पाण्याची वाटणी करून दिलेली आहे. त्यामुळे पाणी एकाच भागाचे आहे, असे म्हणता येत नाही. पाण्याची समन्यायी वाटणी झालेली आहे. त्यामुळे ही बाब न्यायालयात मांडली पाहिजे. जायकवाडीवरील २३ मोठ्या व मध्यम धरणांत ८७.७० टीएमसी पाणी क्षमता आहे. खरिपातील वापर आणि आजची शिल्लक असे ९६.५० टीएमसी पाणी आहे. त्यातून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्याप्रमाणे जायकवाडीसाठी ९ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी दिल्यानंतरही वरच्या धरणांत ८७.५० टीएमसी पाणी राहील. त्यामुळे नगर, नाशिकमधून विरोध होता कामा नये, असे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यापर्यंत कार्यवाही१५ आॅक्टोबरला हिशोब आणि समन्यायी पाणी वाटप करून ३१ आॅक्टोबरपर्यंत वरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी द्यावे, असा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर २०१४ मध्ये निर्णय दिलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश होते; परंतु एखाद्या धरण समूहातून पाणी सोडण्याची कार्यवाही तांत्रिक अपरिहार्य कारणामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करणे शक्य झाले नाही तर निर्धारित पाणीसाठा सोडण्यापर्यंत कार्यवाही चालू ठेवावी, असेही आदेश आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या बाजूने निकाल लागण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास जलतज्ज्ञतांनी व्यक्त केला.शासन मराठवाड्याच्या बाजूनेजायकवाडीतील पाण्याचा लाभ ज्यांना मिळतो, ते सध्या काहीही बोलताना दिसत नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याची बाजू मजबूत, कायदेशीर आहे. यावेळी शासनही आपल्या बाजूने आहे. न्यायालयात ते मांडणी करीत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाला, तर ३१ आॅक्टोबर तारखेची कोणतीही अडचण येणार नाही.- या. रा. जाधव, जलतज्ज्ञतारखेचा मुद्दामहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाचा मुद्दा पुढे करून पाणी सोडण्यास स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु गोदावरी नदी ही आंतरराज्य नदी आहे. वरच्या धरणांतून सोडण्यात येणारे पाणी समन्यायी पाणी वाटपाप्रमाणे दिले जात आहे आणि कायद्यानुसार आहे, हे पटवून देण्याची गरज आहे.- शंकर नागरे, जलतज्ज्ञपाणी सोडणे शक्यमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे, हे गृहीत धरूनच तयारी करण्याची गरज होती. त्यानुसार खूप आधीच पाणी सोडण्याची तयारी केली पाहिजे होती; परंतु पाटबंधारे विभागाने योग्य भूमिका घेतली नाही.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMarathwadaमराठवाडा