शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच मीटरने खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:56 IST

मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे.

ठळक मुद्दे ६५ तालुके ड्राय : विभागातील फक्त ११ तालुक्यांत पाणीपातळीत वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे. झपाट्याने पाणीपातळी कमी होत असताना जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरले हे कळण्यास मार्ग नाही. विभागात २३०० कोटींच्या आसपासचा खर्च जलयुक्त शिवार योजनेवर करण्यात आला आहे. असे असताना विभागातील फक्त ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.७६ पैकी ६५ तालुक्यात बोअरला पाणी लागण्याची परिस्थिती नाही. तर ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. २३ तालुक्यांत ३ मीटरपर्यंत, २० तालुक्यांत ३ मीटरपेक्षा जास्त, तर १५ तालुक्यांत २ मीटर खालपर्यंत पाणीपातळी घटली आहे. ७ तालुक्यांत १ मीटरपर्यंत पाणीपातळी आहे.पाच वर्षांपूर्वी आॅक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत तपासलेल्या भूजल पातळीच्या अंदाजनुसार यंदा अडीच ते तीन मीटरदरम्यान पाणीपातळी खाली गेली आहे. कमी पर्जन्यमान, जमिनीत पाणी मुरविण्याच्या योजनांतून काहीही साध्य न होणे, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही यशस्वी होण्यात अडथळे आल्याने भूजल पातळीत वाढ होऊ शकली नाही, असेच म्हणावे लागेल. विभागातील ८७५ विहिरींच्या निरीक्षणातून भूजल सर्वेक्षण विभागाने पाणीपातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. पुढील काही महिन्यांत यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.३५०० गावांत जलयुक्त शिवार योजनामराठवाड्यातील ३५०० गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यातून तीन वर्षांत ८.१९ लक्ष टीसीएम पाणी मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तरी पूर्ण विभाग दुष्काळाच्या छायेखाली आल्याने योजनेवर खर्च करण्यात आलेले २ हजार ३०० कोटींचे पाणी कुठे मुरले, हा प्रश्न आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे मराठवाड्यात पूर्ण करण्यात आली. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर का, याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसले आहे. साचलेले पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरले याची माहिती पुढे येणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ