शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच मीटरने खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:56 IST

मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे.

ठळक मुद्दे ६५ तालुके ड्राय : विभागातील फक्त ११ तालुक्यांत पाणीपातळीत वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे. झपाट्याने पाणीपातळी कमी होत असताना जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरले हे कळण्यास मार्ग नाही. विभागात २३०० कोटींच्या आसपासचा खर्च जलयुक्त शिवार योजनेवर करण्यात आला आहे. असे असताना विभागातील फक्त ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.७६ पैकी ६५ तालुक्यात बोअरला पाणी लागण्याची परिस्थिती नाही. तर ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. २३ तालुक्यांत ३ मीटरपर्यंत, २० तालुक्यांत ३ मीटरपेक्षा जास्त, तर १५ तालुक्यांत २ मीटर खालपर्यंत पाणीपातळी घटली आहे. ७ तालुक्यांत १ मीटरपर्यंत पाणीपातळी आहे.पाच वर्षांपूर्वी आॅक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत तपासलेल्या भूजल पातळीच्या अंदाजनुसार यंदा अडीच ते तीन मीटरदरम्यान पाणीपातळी खाली गेली आहे. कमी पर्जन्यमान, जमिनीत पाणी मुरविण्याच्या योजनांतून काहीही साध्य न होणे, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही यशस्वी होण्यात अडथळे आल्याने भूजल पातळीत वाढ होऊ शकली नाही, असेच म्हणावे लागेल. विभागातील ८७५ विहिरींच्या निरीक्षणातून भूजल सर्वेक्षण विभागाने पाणीपातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. पुढील काही महिन्यांत यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.३५०० गावांत जलयुक्त शिवार योजनामराठवाड्यातील ३५०० गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यातून तीन वर्षांत ८.१९ लक्ष टीसीएम पाणी मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तरी पूर्ण विभाग दुष्काळाच्या छायेखाली आल्याने योजनेवर खर्च करण्यात आलेले २ हजार ३०० कोटींचे पाणी कुठे मुरले, हा प्रश्न आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे मराठवाड्यात पूर्ण करण्यात आली. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर का, याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसले आहे. साचलेले पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरले याची माहिती पुढे येणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ