शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच मीटरने खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:56 IST

मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे.

ठळक मुद्दे ६५ तालुके ड्राय : विभागातील फक्त ११ तालुक्यांत पाणीपातळीत वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे. झपाट्याने पाणीपातळी कमी होत असताना जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरले हे कळण्यास मार्ग नाही. विभागात २३०० कोटींच्या आसपासचा खर्च जलयुक्त शिवार योजनेवर करण्यात आला आहे. असे असताना विभागातील फक्त ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.७६ पैकी ६५ तालुक्यात बोअरला पाणी लागण्याची परिस्थिती नाही. तर ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. २३ तालुक्यांत ३ मीटरपर्यंत, २० तालुक्यांत ३ मीटरपेक्षा जास्त, तर १५ तालुक्यांत २ मीटर खालपर्यंत पाणीपातळी घटली आहे. ७ तालुक्यांत १ मीटरपर्यंत पाणीपातळी आहे.पाच वर्षांपूर्वी आॅक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत तपासलेल्या भूजल पातळीच्या अंदाजनुसार यंदा अडीच ते तीन मीटरदरम्यान पाणीपातळी खाली गेली आहे. कमी पर्जन्यमान, जमिनीत पाणी मुरविण्याच्या योजनांतून काहीही साध्य न होणे, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही यशस्वी होण्यात अडथळे आल्याने भूजल पातळीत वाढ होऊ शकली नाही, असेच म्हणावे लागेल. विभागातील ८७५ विहिरींच्या निरीक्षणातून भूजल सर्वेक्षण विभागाने पाणीपातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. पुढील काही महिन्यांत यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.३५०० गावांत जलयुक्त शिवार योजनामराठवाड्यातील ३५०० गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यातून तीन वर्षांत ८.१९ लक्ष टीसीएम पाणी मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तरी पूर्ण विभाग दुष्काळाच्या छायेखाली आल्याने योजनेवर खर्च करण्यात आलेले २ हजार ३०० कोटींचे पाणी कुठे मुरले, हा प्रश्न आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे मराठवाड्यात पूर्ण करण्यात आली. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर का, याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसले आहे. साचलेले पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरले याची माहिती पुढे येणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ