शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 13:09 IST

राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे.

ठळक मुद्देविधी विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, आयसीटी आणि गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणा झाली आहे काही वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या विविध संस्थांच्या स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या संस्था मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

औरंगाबाद : राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. मात्र, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, आयसीटी आणि गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. ही  घोषणा वास्तवात अद्यापही आलेली नाही.

नऊ वर्षांच्या लढ्यानंतर औरंगाबाद शहरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करीत कार्यान्वित केले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी वाजता कांचनवाडी परिसरातील कॅम्पसमध्ये झाले.  मराठवाड्याच्या शैक्षणिक अनुशेषातील ही महत्त्वाची संस्था कार्यान्वित होत असल्यामुळे विधि क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या विविध संस्थांच्या स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या संस्था मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्थाकेंद्र सरकारने महाराष्ट्रात नवीन आयआयएम आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड अर्किटेक्चर संस्था सरू करण्याची घोषणा २०१४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. यातील आयआयएम संस्था औरंगाबादेत स्थापन करण्यासाठी मोठे आंदोलन झाले. तरीही आयआयएम नागपूरला नेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. तेव्हा २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात औरंगाबाद येथे स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्था स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. 

या घोषणेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही संस्था स्थापन करण्याविषयी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. नवी दिल्ली येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर  संस्था आणि केंद्र सरकारच्या नागरविकास मंत्रालयाच्या संयुक्त अहवालानंतर ही संस्था कोठे स्थापन करायची याचा निर्णय मनुष्यबळविकास मंत्रालय घेणार आहे. हा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे या संस्थेचे भवितव्य अधांतरीच आहे.

‘आयसीटी’ला दिली केवळ जमीनचऔरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित ‘इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाचे उपकें द्र जालनाजवळ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. यासाठी जालना जिल्हाधिका-यांच्या ताब्यातील शिरसवाडा येथील २०० एकर जमीन विद्यापीठाला उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिका-यांकडून तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे आणि तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून ‘आयसीटी’कडे हस्तांतरित झाली आहे. मात्र, केवळ हस्तांतरणाशिवाय पुढे काहीही झाले नाही, हे विशेष.

गोपीनाथ मुंडे संस्थेचा विसरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ४ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या औरंगाबादेतील मंत्रिमंडळ बैठकीत १५० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. यास वर्ष उलटून गेले तरी अद्याप फुटकी कवडी मिळालेली नाही. उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्थानिक निधीतून १० कोटी रुपये देत ही संस्था सुरू राहण्याची तरतूद केली आहे. मात्र, राज्य सरकार याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारChief Ministerमुख्यमंत्री