शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 13:09 IST

राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे.

ठळक मुद्देविधी विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, आयसीटी आणि गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणा झाली आहे काही वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या विविध संस्थांच्या स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या संस्था मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

औरंगाबाद : राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. मात्र, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, आयसीटी आणि गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. ही  घोषणा वास्तवात अद्यापही आलेली नाही.

नऊ वर्षांच्या लढ्यानंतर औरंगाबाद शहरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करीत कार्यान्वित केले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी वाजता कांचनवाडी परिसरातील कॅम्पसमध्ये झाले.  मराठवाड्याच्या शैक्षणिक अनुशेषातील ही महत्त्वाची संस्था कार्यान्वित होत असल्यामुळे विधि क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या विविध संस्थांच्या स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या संस्था मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्थाकेंद्र सरकारने महाराष्ट्रात नवीन आयआयएम आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड अर्किटेक्चर संस्था सरू करण्याची घोषणा २०१४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. यातील आयआयएम संस्था औरंगाबादेत स्थापन करण्यासाठी मोठे आंदोलन झाले. तरीही आयआयएम नागपूरला नेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. तेव्हा २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात औरंगाबाद येथे स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्था स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. 

या घोषणेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही संस्था स्थापन करण्याविषयी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. नवी दिल्ली येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर  संस्था आणि केंद्र सरकारच्या नागरविकास मंत्रालयाच्या संयुक्त अहवालानंतर ही संस्था कोठे स्थापन करायची याचा निर्णय मनुष्यबळविकास मंत्रालय घेणार आहे. हा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे या संस्थेचे भवितव्य अधांतरीच आहे.

‘आयसीटी’ला दिली केवळ जमीनचऔरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित ‘इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाचे उपकें द्र जालनाजवळ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. यासाठी जालना जिल्हाधिका-यांच्या ताब्यातील शिरसवाडा येथील २०० एकर जमीन विद्यापीठाला उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिका-यांकडून तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे आणि तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून ‘आयसीटी’कडे हस्तांतरित झाली आहे. मात्र, केवळ हस्तांतरणाशिवाय पुढे काहीही झाले नाही, हे विशेष.

गोपीनाथ मुंडे संस्थेचा विसरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ४ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या औरंगाबादेतील मंत्रिमंडळ बैठकीत १५० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. यास वर्ष उलटून गेले तरी अद्याप फुटकी कवडी मिळालेली नाही. उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्थानिक निधीतून १० कोटी रुपये देत ही संस्था सुरू राहण्याची तरतूद केली आहे. मात्र, राज्य सरकार याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारChief Ministerमुख्यमंत्री