शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:00 IST

सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

हिंगोली/ बहादरपूरा (जि. नांदेड)/ रेणापूर (जि. लातूर) :  सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील एक घटना हिंगोली, दुसरी नांदेड तर तिसरी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली. 

हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील भीमराव शिवाजी सोळंके (२५) या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना गुरूवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

दुसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील जांभूळवाडी (ता. कंधार) येथील बळीराम भीमराव मुसळे (५५) या शेतकऱ्याने नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना १८ जुलै रोजी घडली़ त्यांना उपचारासाठी कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात हालविण्यात आले़ परंतु  तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी कंधार पोलीसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. 

तिसरी घटना लातूर जिल्ह्यातील कामखेडा (ता. रेणापूर) येथील हणमंत संतराम मेकले (४३) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज व नापिकीमुळे झाडाला गळफास घेतला. त्यांच्यावर सुमारे दहा लाखांचे कर्ज होते. अर्थिक संकटामुळे कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMONEYपैसा