शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात अवकाळी पावसाचे तांडव; पाच जणांचा वीज पडून मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:03 IST

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : अवकाळी पावसाने मराठवाड्यात तांडवच घातले आहे. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला. तर ३९ शेळ्या-मेंढ्यासह तीन जनावरे दगावली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे.

भोकर, कंधारमध्ये दोन ठारनांदेड शहर व जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला़ या पावसाने आंबा, केळी पिकांचे नुकसान झाले़ त्याचवेळी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले़ भोकर आणि कंधार तालुक्यात वीज पडून दोन जण मरण पावले.मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पाऊस सुरु झाला़ वाऱ्यांबरोबर पावसाचा जोर वाढत गेला़ पाऊण तास पाऊस झाला़ दरम्यान, भोकर येथे दासा गणेश उपाटे (वय ४२, रा़बारड) यांचा वीज पडून मृत्यू झाला़ तर नावंद्याचीवाडी (ता.कंधार) येथील अनिताबाई व्यंकटी केंद्रे (वय ४५) या शेतात चारा आणायला गेल्या होत्या. वीज कोसळून त्या भाजल्या. त्यांना कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत गजानन केंद्रे हा जखमी झाला़ कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ़अरविंद फिसके व पार्वती वाघमारे यांनी उपचार करून त्याला नांदेड येथे हलविले़ तसेच जिल्ह्यात नायगाव, लोहा, भोकर, नरसी, मुदखेड तालुक्यात पाऊस झाला़ ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडाले़ रस्त्यावरील वृक्षही उन्मळून पडले़ नांदेड शहरातही पाऊस सुरु होताच वीजपुरवठा ठप्प झाला़ 

झाडाचा आसरा घेणे ह्यत्यांच्याह्ण जिवावर बेतलेविजांचा कडकडाट झाला अन् अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. म्हणून तिघे मेंढपाळ मेंढ्यासह लिंबाच्या झाडाच्या आसऱ्याला गेले. तिथेच घात झाला. त्याच झाडावर वीज पडून दोन मेंढपाळ जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. शिवाय ३९ शेळ्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे घडली. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील सुरनवाडी येथील ३०० मेंढ्या आणि ५७ शेळ्यांचा कळप मागील तीन महिन्यांपासून पाथरी तालुक्यातील अंधापुरी शिवारात दाखल झाला होता. या मेंढ्यांचा सांभाळ करण्यासाठी ६ जण, तर शेळ्यांचा सांभाळ करण्यासाठी तीन जण आले होते. १५ एप्रिल रोजी अंधापुरी येथील शेतकरी चंद्रकांत मोरे यांच्या शेतात पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने ते या भागात रमले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंधापुरी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. या पावसापासून बचाव करण्यासाठी तीन मेंढपाळांनी शेळ्या-मेंढ्यासह शेतातील लिंबाच्या झाडाचा सहारा घेतला. ते झाडाखाली थांबले असता काही क्षणातच या झाडावर वीज कोसळली. त्यामध्ये लिंबाजी सीताराम काळे (३५) व कृष्णा रामभाऊ शिंदे (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रामभाऊ साधू शिंदे हे जखमी झाले. यावेळी ५७ पैकी ३९ शेळ्यांचाही मृत्यू झाला. याबाबतची माहिती अन्य शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर जखमी रामभाऊ शिंदे यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर दोन्ही मयतांचे मृतदेह पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मंगळवारी शवविच्छेदन करुन दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. 

बीडमध्ये एक ठारबीड जिल्ह्यात मंगळवारीदेखील काही तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यातील हसनाबाद, कोळपिंप्री, पांगरी, आवरगाव परिसरात गारांसह पाऊस झाला. सोमवारी रात्री  देवदहीफळ येथे वीज पडून एक जण ठार झाला. गेवराई तालुक्यातील भोगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान टरबुजाच्या शेतात काम करणाऱ्या अंजना दत्तात्रय लिंबुरे ( वय ३१) या महिलेच्या अंगावर वीज पडली. त्यांच्यावर सध्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सेनगावात मोबाईल मनोरा कोसळलासेनगाव (जि.हिंगोली) येथील २५० फूट उंच बीएसएनएलचा मनोरा मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने कोळसला. या मनोऱ्याखाली चार घरे, दोन जनावरे व एक चारचाकी वाहनही दबली आहेत. या घटनेत अशोक कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर घरातील आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अशोक कांबळे, सुनील रणबावळे, दीपक आठवले व अन्य एकजण यांच्या घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या जीवितहानी झाली नाही. हा मनोरा जुन्या ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने पडला. मागील अनेक वर्षांपासून या धोकादायक मनोऱ्याची साधी दुरूस्तीही करण्यात आली नव्हती. घटनेनंतर तास उलटला तरी प्रशासन घटनास्थळी आले नव्हते. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडटांसह १६ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस झाला.  वसमत तालुक्यातील कौठा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांपासून कौठा येथे वीज अखंडित आहे. कळमनुरीतही विजेच्या कडकडाटांसह वादळी वारे होते.  हळद व गव्हाचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा