शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताव्यस्त पसरलेले औरंगाबाद झालेय मराठवाड्याची ‘मुंबई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:23 IST

मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे.

ठळक मुद्दे शहराची लोकसंख्या तब्बल १६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे.दरवर्षी अंदाजे ५० हजाराने शहराची लोक संख्या वाढते आहे, असे मानले जाते.

औरंगाबाद : ‘वाढता वाढता वाढे....’ या उक्तीनुसार हनुमानाच्या शेपटीप्रमाणे औरंगाबाद शहराची आणि पर्यायाने आपल्या देशाची लोकसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज चारी बाजूंनी अफाट पसरलेले औरंगाबाद शहर अगदी २० वर्षांपूर्वीही एवढे विस्तारलेले नव्हते. आज मात्र मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे.

गुलमंडी ही शहराची मध्यवर्ती वसाहत आणि त्याच्या आजूबाजूनेच वसलेले शहर असे जुन्या औरंगाबादचे स्वरूप होते. त्यावेळी उस्मानपुरा, क्रांतीचौक हे भाग म्हणजे खूप दूरचा परिसर मानले जायचे. काळानुसार शहर विस्तारले, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले लोक येथे स्थायिक झाले आणि आज शहराची लोकसंख्या तब्बल १६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे.औरंगाबाद शहराची लोकसंख्या-वर्ष  लोकसंख्या१९९१ ५ लाख ७३ हजार २७२२००१ ८ लाख ७३ हजार ३११२०११ ११ लाख ७५ हजार ११६२. दरवर्षी अंदाजे ५० हजाराने शहराची लोक संख्या वाढते आहे, असे मानले जाते. त्यामुळे २०१९ यावर्षीची औरंगाबाद शहराची अंदाजित लोकसंख्या १६ लाख एवढी गृहीत धरली जाते.३. औरंगाबाद शहराचे एकूण क्षेत्रफळ १३८.५ चौरस किलोमीटर असून, ११,५१० लोक प्रतिचौरस किलोमीटर जागेत राहतात.४. २०११ च्या जनगणनेनुसार शहरातील एकूण साक्षरता ८७. ४९ टक्के एवढी असून, यामध्ये पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण ९२. १८ टक्के एवढे असून, महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ८२. ५० टक्के आहे.५. शहरात दर १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९२९ एवढे आहे.६. ० ते ६ या वयोगटामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण दर १००० मुलांमागे ८७१ मुली एवढे आहे.

पाणी पडतेय अपुरे-शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणाचे बांधकाम १९७६ साली पूर्ण झाले. तत्कालीन लोकसंख्येनुसार हा जलसाठा पुरेसा होता; पण आता मात्र शहराच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून, उन्हाळ्यात तर शहराला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.कचरा समस्या-सव्वा वर्षापूर्वी शहरात निर्माण झालेल्या कचरा प्रश्नामुळे औरंगाबाद शहराला थेट जगाच्या नकाशावरच नेऊन ठेवले होते. या प्रक रणात शहराच्या प्रतिमेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे साधारणपणे ४३० मेट्रिक टन कचरा शहरात दररोज निर्माण होत आहे. या कचºयाची विल्हेवाट लावणे हा प्रशासनासमोरील एक गंभीर प्रश्न आहे.वाढते प्रदूषणशहरात स्मार्ट बस अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या असून, लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे शहरात अजूनही खाजगी वाहनांचा वापर करणाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकीधारकांची संख्या लक्षणीय वाढली असून, याचा परिणाम वाढत्या प्रदूषणाच्या रूपात शहरवासीयांना भोगावा लागत आहे. जालना रस्त्यावर दिवसभर दिसून येणारी प्रचंड वाहतूक पाहून शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लगेच अंदाज येतो.पार्किंग सुविधाच नाही-लोकसंख्या आणि वाहनधारकांची संख्या एवढी जास्त असणाºया या शहरात गुलमंडी, पैठणगेट अशी मोजकी ठिकाणे सोडली तर वाहनतळच उपलब्ध नाहीत. सिडकोसारख्या नव्या शहरातही पार्किंगची सुविधा उपलब्ध नसून जुन्या शहरात तर अरुंद रस्ते आणि दाट लोकवस्तीमुळे वाहनतळच नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका