शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

अस्ताव्यस्त पसरलेले औरंगाबाद झालेय मराठवाड्याची ‘मुंबई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:23 IST

मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे.

ठळक मुद्दे शहराची लोकसंख्या तब्बल १६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे.दरवर्षी अंदाजे ५० हजाराने शहराची लोक संख्या वाढते आहे, असे मानले जाते.

औरंगाबाद : ‘वाढता वाढता वाढे....’ या उक्तीनुसार हनुमानाच्या शेपटीप्रमाणे औरंगाबाद शहराची आणि पर्यायाने आपल्या देशाची लोकसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज चारी बाजूंनी अफाट पसरलेले औरंगाबाद शहर अगदी २० वर्षांपूर्वीही एवढे विस्तारलेले नव्हते. आज मात्र मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे.

गुलमंडी ही शहराची मध्यवर्ती वसाहत आणि त्याच्या आजूबाजूनेच वसलेले शहर असे जुन्या औरंगाबादचे स्वरूप होते. त्यावेळी उस्मानपुरा, क्रांतीचौक हे भाग म्हणजे खूप दूरचा परिसर मानले जायचे. काळानुसार शहर विस्तारले, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले लोक येथे स्थायिक झाले आणि आज शहराची लोकसंख्या तब्बल १६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे.औरंगाबाद शहराची लोकसंख्या-वर्ष  लोकसंख्या१९९१ ५ लाख ७३ हजार २७२२००१ ८ लाख ७३ हजार ३११२०११ ११ लाख ७५ हजार ११६२. दरवर्षी अंदाजे ५० हजाराने शहराची लोक संख्या वाढते आहे, असे मानले जाते. त्यामुळे २०१९ यावर्षीची औरंगाबाद शहराची अंदाजित लोकसंख्या १६ लाख एवढी गृहीत धरली जाते.३. औरंगाबाद शहराचे एकूण क्षेत्रफळ १३८.५ चौरस किलोमीटर असून, ११,५१० लोक प्रतिचौरस किलोमीटर जागेत राहतात.४. २०११ च्या जनगणनेनुसार शहरातील एकूण साक्षरता ८७. ४९ टक्के एवढी असून, यामध्ये पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण ९२. १८ टक्के एवढे असून, महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ८२. ५० टक्के आहे.५. शहरात दर १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९२९ एवढे आहे.६. ० ते ६ या वयोगटामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण दर १००० मुलांमागे ८७१ मुली एवढे आहे.

पाणी पडतेय अपुरे-शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणाचे बांधकाम १९७६ साली पूर्ण झाले. तत्कालीन लोकसंख्येनुसार हा जलसाठा पुरेसा होता; पण आता मात्र शहराच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून, उन्हाळ्यात तर शहराला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.कचरा समस्या-सव्वा वर्षापूर्वी शहरात निर्माण झालेल्या कचरा प्रश्नामुळे औरंगाबाद शहराला थेट जगाच्या नकाशावरच नेऊन ठेवले होते. या प्रक रणात शहराच्या प्रतिमेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे साधारणपणे ४३० मेट्रिक टन कचरा शहरात दररोज निर्माण होत आहे. या कचºयाची विल्हेवाट लावणे हा प्रशासनासमोरील एक गंभीर प्रश्न आहे.वाढते प्रदूषणशहरात स्मार्ट बस अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या असून, लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे शहरात अजूनही खाजगी वाहनांचा वापर करणाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकीधारकांची संख्या लक्षणीय वाढली असून, याचा परिणाम वाढत्या प्रदूषणाच्या रूपात शहरवासीयांना भोगावा लागत आहे. जालना रस्त्यावर दिवसभर दिसून येणारी प्रचंड वाहतूक पाहून शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लगेच अंदाज येतो.पार्किंग सुविधाच नाही-लोकसंख्या आणि वाहनधारकांची संख्या एवढी जास्त असणाºया या शहरात गुलमंडी, पैठणगेट अशी मोजकी ठिकाणे सोडली तर वाहनतळच उपलब्ध नाहीत. सिडकोसारख्या नव्या शहरातही पार्किंगची सुविधा उपलब्ध नसून जुन्या शहरात तर अरुंद रस्ते आणि दाट लोकवस्तीमुळे वाहनतळच नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका