शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:00 IST

प्रकल्पांतील  २१ टक्के पाणी घटले : मे महिन्यात ५१ टक्के होता जलसाठा, बाष्पीभवनात वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील लहान, मोठ्या व मध्यम जलप्रकल्पांना कमी पावसाचा फटका बसला आहे. मे अखेरीस ५१ टक्के जलसाठा होता. जून महिन्यात धरणांतील पाणीपातळी ४० टक्क्यांवर आली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३० टक्क्यांवर जलसाठा आला आहे. दोन महिन्यांत २१ टक्के पाणी घटले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २६ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणी कमी झाले आहे. उन्हाचा पारा आणि कमी पर्जन्यमान त्यातच वाढलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांतील २५.००१८ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याची वाफ (बाष्पीभवन) झाली आहे. मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ७ हून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर ५५ प्रकल्पांत सध्या जोत्याच्या खालीवर जलसाठा आहे. २११ प्रकल्पांत २६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात विभागातील सगळी धरणे ओसंडली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा २०२०-२१ च्या तुलनेत बऱ्यापैकी होता, मात्र तापमान वाढल्याचा व कमी पावसाचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. मागच्या वर्षी एप्रिल अखेरीस ५६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा विभागात होता. मे महिन्याच्या अखेरीस ४० टक्क्यांवर धरणे होती. तर जूनअखेरीस ४१ टक्के जलसाठा धरणांमध्ये होता. या वर्षी परिस्थिती चिंताजनक आहे.

दमदार पावसाची अपेक्षामराठवाड्यातील जलप्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ६७९ मि.मी. वार्षिक पर्जन्यमान आहे. त्या तुलनेत १६४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात मुबलक जलसाठा आलेला नाही.

जायकवाडी ५६ वरून ३३ टक्क्यांवरजायकवाडी धरणात मे महिन्यात ५६ व जून महिन्यात ४३ टक्के पाणी होते. आता ३० टक्के आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.८९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मध्यम प्रकल्पांतील जलसाठा ४५ वरून ३० टक्क्यांवर आला आहे. लघू प्रकल्पात ३१ वरून २० टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ वरून ३५ टक्के जलसाठा झाला आहे. इतर बंधाऱ्यांत ८९ वरून ६५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

विभागातील प्रकल्पांतील अंदाजे जलसाठा असामोठे प्रकल्प - ११ - ४१.११ टक्के जलसाठामध्यम प्रकल्प - ७५ - ३०.०२ टक्के जलसाठालघू प्रकल्प - ७४९ - २०.६२ टक्के जलसाठागोदावरी बंधारे - १५ - ३५.४१ टक्के जलसाठाइतर बंधारे - २५ - ६५.३८ टक्के जलसाठाएकूण - ८७५- ३०.७७ टक्के जलसाठा

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद