शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:00 IST

प्रकल्पांतील  २१ टक्के पाणी घटले : मे महिन्यात ५१ टक्के होता जलसाठा, बाष्पीभवनात वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील लहान, मोठ्या व मध्यम जलप्रकल्पांना कमी पावसाचा फटका बसला आहे. मे अखेरीस ५१ टक्के जलसाठा होता. जून महिन्यात धरणांतील पाणीपातळी ४० टक्क्यांवर आली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३० टक्क्यांवर जलसाठा आला आहे. दोन महिन्यांत २१ टक्के पाणी घटले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २६ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणी कमी झाले आहे. उन्हाचा पारा आणि कमी पर्जन्यमान त्यातच वाढलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांतील २५.००१८ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याची वाफ (बाष्पीभवन) झाली आहे. मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ७ हून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर ५५ प्रकल्पांत सध्या जोत्याच्या खालीवर जलसाठा आहे. २११ प्रकल्पांत २६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात विभागातील सगळी धरणे ओसंडली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा २०२०-२१ च्या तुलनेत बऱ्यापैकी होता, मात्र तापमान वाढल्याचा व कमी पावसाचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. मागच्या वर्षी एप्रिल अखेरीस ५६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा विभागात होता. मे महिन्याच्या अखेरीस ४० टक्क्यांवर धरणे होती. तर जूनअखेरीस ४१ टक्के जलसाठा धरणांमध्ये होता. या वर्षी परिस्थिती चिंताजनक आहे.

दमदार पावसाची अपेक्षामराठवाड्यातील जलप्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ६७९ मि.मी. वार्षिक पर्जन्यमान आहे. त्या तुलनेत १६४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात मुबलक जलसाठा आलेला नाही.

जायकवाडी ५६ वरून ३३ टक्क्यांवरजायकवाडी धरणात मे महिन्यात ५६ व जून महिन्यात ४३ टक्के पाणी होते. आता ३० टक्के आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.८९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मध्यम प्रकल्पांतील जलसाठा ४५ वरून ३० टक्क्यांवर आला आहे. लघू प्रकल्पात ३१ वरून २० टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ वरून ३५ टक्के जलसाठा झाला आहे. इतर बंधाऱ्यांत ८९ वरून ६५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

विभागातील प्रकल्पांतील अंदाजे जलसाठा असामोठे प्रकल्प - ११ - ४१.११ टक्के जलसाठामध्यम प्रकल्प - ७५ - ३०.०२ टक्के जलसाठालघू प्रकल्प - ७४९ - २०.६२ टक्के जलसाठागोदावरी बंधारे - १५ - ३५.४१ टक्के जलसाठाइतर बंधारे - २५ - ६५.३८ टक्के जलसाठाएकूण - ८७५- ३०.७७ टक्के जलसाठा

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद