शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:00 IST

प्रकल्पांतील  २१ टक्के पाणी घटले : मे महिन्यात ५१ टक्के होता जलसाठा, बाष्पीभवनात वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील लहान, मोठ्या व मध्यम जलप्रकल्पांना कमी पावसाचा फटका बसला आहे. मे अखेरीस ५१ टक्के जलसाठा होता. जून महिन्यात धरणांतील पाणीपातळी ४० टक्क्यांवर आली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३० टक्क्यांवर जलसाठा आला आहे. दोन महिन्यांत २१ टक्के पाणी घटले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २६ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणी कमी झाले आहे. उन्हाचा पारा आणि कमी पर्जन्यमान त्यातच वाढलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांतील २५.००१८ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याची वाफ (बाष्पीभवन) झाली आहे. मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ७ हून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर ५५ प्रकल्पांत सध्या जोत्याच्या खालीवर जलसाठा आहे. २११ प्रकल्पांत २६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात विभागातील सगळी धरणे ओसंडली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा २०२०-२१ च्या तुलनेत बऱ्यापैकी होता, मात्र तापमान वाढल्याचा व कमी पावसाचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. मागच्या वर्षी एप्रिल अखेरीस ५६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा विभागात होता. मे महिन्याच्या अखेरीस ४० टक्क्यांवर धरणे होती. तर जूनअखेरीस ४१ टक्के जलसाठा धरणांमध्ये होता. या वर्षी परिस्थिती चिंताजनक आहे.

दमदार पावसाची अपेक्षामराठवाड्यातील जलप्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ६७९ मि.मी. वार्षिक पर्जन्यमान आहे. त्या तुलनेत १६४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात मुबलक जलसाठा आलेला नाही.

जायकवाडी ५६ वरून ३३ टक्क्यांवरजायकवाडी धरणात मे महिन्यात ५६ व जून महिन्यात ४३ टक्के पाणी होते. आता ३० टक्के आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.८९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मध्यम प्रकल्पांतील जलसाठा ४५ वरून ३० टक्क्यांवर आला आहे. लघू प्रकल्पात ३१ वरून २० टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ वरून ३५ टक्के जलसाठा झाला आहे. इतर बंधाऱ्यांत ८९ वरून ६५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

विभागातील प्रकल्पांतील अंदाजे जलसाठा असामोठे प्रकल्प - ११ - ४१.११ टक्के जलसाठामध्यम प्रकल्प - ७५ - ३०.०२ टक्के जलसाठालघू प्रकल्प - ७४९ - २०.६२ टक्के जलसाठागोदावरी बंधारे - १५ - ३५.४१ टक्के जलसाठाइतर बंधारे - २५ - ६५.३८ टक्के जलसाठाएकूण - ८७५- ३०.७७ टक्के जलसाठा

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद