शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

'मराठवाडा कोकणासारखा झालाय, आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:56 IST

मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो

ठळक मुद्देमराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत

औरगाबाद - मराठवाडा म्हटलं की दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, वाळलेली रानं आणि पाण्याची, पावसाची वाट बघणारा माणूस हे चित्र डोळ्यासमोर उभा राहतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातही सौंदर्य फुललंय. बालाघाटच्या डोंगररांगात निसर्ग अवरतरलाय. नदी, नाले, धरणं तुंबड वाहत आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातील एका छायाचित्रकाराने महाराष्ट्र टुरिझम विभागाला प्रश्न केला आहे. 

आमच्या मराठवाड्यावर अन्याय नको, हे राजकारणातील दिग्गज नेत्यांचं वाक्य महाराष्ट्राला परिचित आहे. निधी देण्याच्या बाबतीत, योजना मंजूरीच्या बाबतीत किंवा शेतकरी प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होतो, असा सूर निघतो. आता, मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी, वारंवार ते मराठवाड्यातील निसर्ग सौंदर्याचे, ऐतिहासिक वास्तूंचे फोटो शेअर करुन महाराष्ट्र टुरिझम विभाग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना टॅग करत असतात. आजही त्यांनी फेसबुक पोस्ट करत, पावसामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा दाखवा, अशी हाक या विभागाला घातली आहे. 

मराठवाड्यात अगदी कोकणासारखं वातावरण झालयं... सतत पाऊस, नद्या वाहत आहेत, ओसंडुन वाहणारे धबधबे, डोंगरद-या हिरव्यागार... आता तरी महाराष्ट्र टुरिझमच्या FB पेजने मराठवाड्यातले फोटो टाकायला काय हरकतय?, असा प्रश्न सचिन यांनी विचारला आहे. आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका... असेही त्यांनी म्हटलं आहे.   

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादचं नाव घेतलं जात. येथील अजंठा-वेरुळ लेणी, बीवी का मगबरा, दौलताबाद किल्ला आणि निजामशहा, औरंगजेब बादशहा यांच्या वास्तू संग्रहालयाचे पर्यटन करण्यासाठी विदेशातून पर्यटक येत असतात. एकीकडे पर्यटनांचा ऐतिहासिक वारसा लाभला असताना, दुसरीकडे मराठवाडा म्हणजे दुष्काळी पट्टा, पावसाची वाट बघणारा शेतकरी असंच चित्र निर्माण झालय. मात्र, या मराठवाड्यातही निसर्ग सौंदर्य आहे, ते पाहिल्यास दिसेल. तसेच, मराठवाड्याचं हे सुंदर रुप महाराष्ट्र टुरिझम विभागाने दाखवल्यास निश्चितच मराठवाड्यात आणखी पर्यटन वाढेल, अशीच भावना सचिन यांनी व्यक्त केली आहे.  

पावसामुळे रामेश्वर धबधबा ठरलाय आकर्षण 

बीड जिल्ह्यातील कपिलधार असेल, सौताड्याचा धबधबा असेल, कंकालेश्वर मंदिर असेल, बालाघाटच्या डोंगररांगा असतील, औरंगाबाद असेल, औंढा-नागनाथाचं मंदिर असेल, नुकतेच सिने अभिनेते सयाजी शिंदेनी उभारलेली देवराई वनराई असेल, यामुळे मराठवाड्याचंही निसर्ग सौंदर्य बहरंल आहे. पावसामुळे सौताड्यातील रामेश्वर धबधबाही ओसंडून वाहत आहे. तर, कपिलधारलाही सुंदर निसर्गचित्र उभा राहिलंय. 

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRainपाऊस