शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

'मराठवाडा कोकणासारखा झालाय, आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:56 IST

मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो

ठळक मुद्देमराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत

औरगाबाद - मराठवाडा म्हटलं की दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, वाळलेली रानं आणि पाण्याची, पावसाची वाट बघणारा माणूस हे चित्र डोळ्यासमोर उभा राहतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातही सौंदर्य फुललंय. बालाघाटच्या डोंगररांगात निसर्ग अवरतरलाय. नदी, नाले, धरणं तुंबड वाहत आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातील एका छायाचित्रकाराने महाराष्ट्र टुरिझम विभागाला प्रश्न केला आहे. 

आमच्या मराठवाड्यावर अन्याय नको, हे राजकारणातील दिग्गज नेत्यांचं वाक्य महाराष्ट्राला परिचित आहे. निधी देण्याच्या बाबतीत, योजना मंजूरीच्या बाबतीत किंवा शेतकरी प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होतो, असा सूर निघतो. आता, मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी, वारंवार ते मराठवाड्यातील निसर्ग सौंदर्याचे, ऐतिहासिक वास्तूंचे फोटो शेअर करुन महाराष्ट्र टुरिझम विभाग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना टॅग करत असतात. आजही त्यांनी फेसबुक पोस्ट करत, पावसामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा दाखवा, अशी हाक या विभागाला घातली आहे. 

मराठवाड्यात अगदी कोकणासारखं वातावरण झालयं... सतत पाऊस, नद्या वाहत आहेत, ओसंडुन वाहणारे धबधबे, डोंगरद-या हिरव्यागार... आता तरी महाराष्ट्र टुरिझमच्या FB पेजने मराठवाड्यातले फोटो टाकायला काय हरकतय?, असा प्रश्न सचिन यांनी विचारला आहे. आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका... असेही त्यांनी म्हटलं आहे.   

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादचं नाव घेतलं जात. येथील अजंठा-वेरुळ लेणी, बीवी का मगबरा, दौलताबाद किल्ला आणि निजामशहा, औरंगजेब बादशहा यांच्या वास्तू संग्रहालयाचे पर्यटन करण्यासाठी विदेशातून पर्यटक येत असतात. एकीकडे पर्यटनांचा ऐतिहासिक वारसा लाभला असताना, दुसरीकडे मराठवाडा म्हणजे दुष्काळी पट्टा, पावसाची वाट बघणारा शेतकरी असंच चित्र निर्माण झालय. मात्र, या मराठवाड्यातही निसर्ग सौंदर्य आहे, ते पाहिल्यास दिसेल. तसेच, मराठवाड्याचं हे सुंदर रुप महाराष्ट्र टुरिझम विभागाने दाखवल्यास निश्चितच मराठवाड्यात आणखी पर्यटन वाढेल, अशीच भावना सचिन यांनी व्यक्त केली आहे.  

पावसामुळे रामेश्वर धबधबा ठरलाय आकर्षण 

बीड जिल्ह्यातील कपिलधार असेल, सौताड्याचा धबधबा असेल, कंकालेश्वर मंदिर असेल, बालाघाटच्या डोंगररांगा असतील, औरंगाबाद असेल, औंढा-नागनाथाचं मंदिर असेल, नुकतेच सिने अभिनेते सयाजी शिंदेनी उभारलेली देवराई वनराई असेल, यामुळे मराठवाड्याचंही निसर्ग सौंदर्य बहरंल आहे. पावसामुळे सौताड्यातील रामेश्वर धबधबाही ओसंडून वाहत आहे. तर, कपिलधारलाही सुंदर निसर्गचित्र उभा राहिलंय. 

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRainपाऊस