सिंचन घोटाळ्यामुळे मराठवाड्याचे २७ कोटींचे नुकसान

By Admin | Updated: June 15, 2014 00:57 IST2014-06-15T00:06:19+5:302014-06-15T00:57:14+5:30

लातूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यात मराठवाड्याचे २२ ते २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान आहे़

Marathwada damages 27 crores due to irrigation scam | सिंचन घोटाळ्यामुळे मराठवाड्याचे २७ कोटींचे नुकसान

सिंचन घोटाळ्यामुळे मराठवाड्याचे २७ कोटींचे नुकसान

लातूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यात मराठवाड्याचे २२ ते २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान आहे़ हे नुकसान सहजरित्या भरुन येणार नाही़ राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने यासंदर्भातील मंत्र्यांना मात्र दोषमुक्त केले असल्याचा पलटवार भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला़
पुढे भंडारी म्हणाले, राज्यातील जनतेच्या मनातील असंतोषाची भावना अजूनही निवळली नाही़ गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मात निधनाच्या धक्क्यातून कार्यकर्ते अजूनही सावरले नाहीत़ राज्य सरकारने आदर्श घोटाळा, मावळमधील गोळीबारप्रमाणेच सिंचन घोटाळ्यातही भूमिका बजावली आहे़ जालना जिल्ह्यातील बंधाऱ्यात २७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार तुषार गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज अयोग्य पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द२बातल केला आहे़ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांची दखल घेण्यात आली नाही़ यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याबरोबरच न्यायालयातही जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले़ यावेळी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, सुधीर धुत्तेकर, अविनाश कोळी यांची उपस्थिती होती़

Web Title: Marathwada damages 27 crores due to irrigation scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.