शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळवाडा नव्हे मराठवाडा झाला ‘पाणीदार’; भूजल पातळीत १.७० मीटरने वाढ

By साहेबराव हिवराळे | Updated: November 12, 2022 18:35 IST

मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे.

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : सातत्याने दुष्काळाशी दोन हात करणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला असून, दमदार पर्जन्यवृष्टीमुळे विभागातील पाणीपातळीत सप्टेंबरमध्ये २.७१ मीटरने, तर पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत ८७५ निरीक्षण विहिरींच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. यंदा पाणीटंचाई मराठवाड्याला भेडसावणार नसल्याचे मत भूजल विभागाने व्यक्त केले आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्याचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याचे सिंचन होत नाही, त्यामुळे उतरावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे. यंदा सातत्याने पावसाचे हजेरी लावल्याने मराठवाड्यात भूजल पातळी २.७१ ते १.७० मीटरने वाढली आहे. दरवर्षीच ‘दुष्काळवाडा’ म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला आहे. पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे, पिके वाहून गेल्याचे चित्र ताजे आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्याला ब्रेक लागणार आहे.

मराठवाड्यातील भूजल पातळीजिल्हा.......निरीक्षण विहिरी....पाणी पातळीतील वाढऔरंगाबाद.........१४१...................१.६०जालना.............११०...................१.८०परभणी.............८६....................३.२२हिंगोली.............५५....................०.७५नांदेड...............१३४...................२.१४लातूर...............१०९...................१.३५उस्मानाबाद........११४...................१.६९बीड..................१२६...................१.६२एकूण................८७५....................१.७०(पाणी पातळी मीटरमध्ये)

सर्व तालुक्यांत भूजल पातळीत वाढ८७५ निरीक्षण विहिरीतील पाणी पातळी मोजली असता मराठवाड्यात यंदा पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने पाणी पातळी वाढली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुके असून, त्यातील प्रत्येक तालुक्यातील पाणी पातळी पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असल्याने गावातील व शेतातील पाणीप्रश्न यंदा भेडसावणार नाही, असे मानले जाते.

सिंचन वाढविण्याची गरजसरासरीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर निरीक्षण विहिरींची तपासणी केली असता त्यात मराठवाड्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. उतारावरील पाणी वाहून न जाता त्याचे सिंचन वाढविण्याची गरज आहे.- भीमराव मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, औरंगाबाद

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद