शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

दुष्काळवाडा नव्हे मराठवाडा झाला ‘पाणीदार’; भूजल पातळीत १.७० मीटरने वाढ

By साहेबराव हिवराळे | Updated: November 12, 2022 18:35 IST

मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे.

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : सातत्याने दुष्काळाशी दोन हात करणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला असून, दमदार पर्जन्यवृष्टीमुळे विभागातील पाणीपातळीत सप्टेंबरमध्ये २.७१ मीटरने, तर पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत ८७५ निरीक्षण विहिरींच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. यंदा पाणीटंचाई मराठवाड्याला भेडसावणार नसल्याचे मत भूजल विभागाने व्यक्त केले आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्याचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याचे सिंचन होत नाही, त्यामुळे उतरावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे. यंदा सातत्याने पावसाचे हजेरी लावल्याने मराठवाड्यात भूजल पातळी २.७१ ते १.७० मीटरने वाढली आहे. दरवर्षीच ‘दुष्काळवाडा’ म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला आहे. पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे, पिके वाहून गेल्याचे चित्र ताजे आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्याला ब्रेक लागणार आहे.

मराठवाड्यातील भूजल पातळीजिल्हा.......निरीक्षण विहिरी....पाणी पातळीतील वाढऔरंगाबाद.........१४१...................१.६०जालना.............११०...................१.८०परभणी.............८६....................३.२२हिंगोली.............५५....................०.७५नांदेड...............१३४...................२.१४लातूर...............१०९...................१.३५उस्मानाबाद........११४...................१.६९बीड..................१२६...................१.६२एकूण................८७५....................१.७०(पाणी पातळी मीटरमध्ये)

सर्व तालुक्यांत भूजल पातळीत वाढ८७५ निरीक्षण विहिरीतील पाणी पातळी मोजली असता मराठवाड्यात यंदा पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने पाणी पातळी वाढली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुके असून, त्यातील प्रत्येक तालुक्यातील पाणी पातळी पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असल्याने गावातील व शेतातील पाणीप्रश्न यंदा भेडसावणार नाही, असे मानले जाते.

सिंचन वाढविण्याची गरजसरासरीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर निरीक्षण विहिरींची तपासणी केली असता त्यात मराठवाड्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. उतारावरील पाणी वाहून न जाता त्याचे सिंचन वाढविण्याची गरज आहे.- भीमराव मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, औरंगाबाद

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद