शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा...'; युवक महोत्सवात ठसकेबाज लावण्या अन् तरुणाईचा जल्लोष

By राम शिनगारे | Updated: October 7, 2023 13:04 IST

एकाहून एक अशा सरस ठसकेबाज लावण्यांची पेशकश अन् त्यावर थिरकणाऱ्या तरुणांचा जल्लोष.

छत्रपती संभाजीनगर : दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या लावण्या तब्बल पाच तास उशिराने सुरू झाल्या. तोपर्यंत सृजनरंग मंचाकडे तरुणांची तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेलेली होती. इतर मंचावरील कार्यक्रम संपत आल्यामुळे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लावणी कलाप्रकाराला सुरुवात झाली. एकाहून एक अशा सरस ठसकेबाज लावण्यांची पेशकश अन् त्यावर थिरकणाऱ्या तरुणांचा जल्लोष..असंच काहीस चित्र युवा महोत्सवातील तिसऱ्या दिवसांच्या सायंकाळी लावणीच्या सादरीकरणामुळे दिसून आले.

लावणी कलाप्रकाराची सुरुवात योगेश्वरी महाविद्यालयाच्या कलाकाराने 'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा' अशी आर्त हाक मंचावरून देताच सभागृह मनापासून झुलू लागले. टाळ्या, शिट्ट्यांचा गजर करीत तरुणाईने कलाकारासारखाचं नृत्याचे सादरीकरण केले. समोरचे मान डोलवून, तर मागचे ठेका धरून नाचू लागत, असे एकदा नव्हे तर वारंवार म्हणजे तब्बल दहा वेळा घडले. कोहिनूर महाविद्यालयाच्या कलाकाराने 'मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा'चा ठेका धरला. लावणीसाठी ७० संघांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ संघांनी हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत २० लावण्या सादर झाल्या होत्या. त्यामध्ये राजसा विडा रंगला ओठी, प्रीतीच्या झुल्यात झुलवा, मला जाऊद्या ना घरी, रेशमाच्या रेघांनी, कशी दिसते मी, केवड्याचं जसं बन, आदी लावण्या सादर झाल्या. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान, वाद-विवादातून काढले एकमेकांचे प्रश्न खोडूनकृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान समाजाला शाप ठरते की वरदान यावर युवा महोत्सवात मोठ्या प्रमाणात खल करण्यात आला. प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाने एकमेकांचे प्रश्न खोडून काढत दोन्ही बाजू मांडल्या. निमित्त होते वाद-विवाद स्पर्धेचे. सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याविषयी सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे. मानवाला लागणाऱ्या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्राकडून करून घेण्यास सुरुवात झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या आडून अनेकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या जातील. चुकीच्या पद्धतीने सर्व यंत्रणा राबविण्यात येईल. त्यामुळे हे तंत्रज्ञान मानव समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारे ठरेल, अशी एक बाजू काही विद्यार्थ्यांनी मांडली. समर्थनात अनेकांनी तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे मानवाचे जीवन कसे सुसह्य बनले आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाने मानवाच्या विकासात हातभार लावला असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण