शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा...'; युवक महोत्सवात ठसकेबाज लावण्या अन् तरुणाईचा जल्लोष

By राम शिनगारे | Updated: October 7, 2023 13:04 IST

एकाहून एक अशा सरस ठसकेबाज लावण्यांची पेशकश अन् त्यावर थिरकणाऱ्या तरुणांचा जल्लोष.

छत्रपती संभाजीनगर : दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या लावण्या तब्बल पाच तास उशिराने सुरू झाल्या. तोपर्यंत सृजनरंग मंचाकडे तरुणांची तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेलेली होती. इतर मंचावरील कार्यक्रम संपत आल्यामुळे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लावणी कलाप्रकाराला सुरुवात झाली. एकाहून एक अशा सरस ठसकेबाज लावण्यांची पेशकश अन् त्यावर थिरकणाऱ्या तरुणांचा जल्लोष..असंच काहीस चित्र युवा महोत्सवातील तिसऱ्या दिवसांच्या सायंकाळी लावणीच्या सादरीकरणामुळे दिसून आले.

लावणी कलाप्रकाराची सुरुवात योगेश्वरी महाविद्यालयाच्या कलाकाराने 'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा' अशी आर्त हाक मंचावरून देताच सभागृह मनापासून झुलू लागले. टाळ्या, शिट्ट्यांचा गजर करीत तरुणाईने कलाकारासारखाचं नृत्याचे सादरीकरण केले. समोरचे मान डोलवून, तर मागचे ठेका धरून नाचू लागत, असे एकदा नव्हे तर वारंवार म्हणजे तब्बल दहा वेळा घडले. कोहिनूर महाविद्यालयाच्या कलाकाराने 'मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा'चा ठेका धरला. लावणीसाठी ७० संघांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ संघांनी हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत २० लावण्या सादर झाल्या होत्या. त्यामध्ये राजसा विडा रंगला ओठी, प्रीतीच्या झुल्यात झुलवा, मला जाऊद्या ना घरी, रेशमाच्या रेघांनी, कशी दिसते मी, केवड्याचं जसं बन, आदी लावण्या सादर झाल्या. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान, वाद-विवादातून काढले एकमेकांचे प्रश्न खोडूनकृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान समाजाला शाप ठरते की वरदान यावर युवा महोत्सवात मोठ्या प्रमाणात खल करण्यात आला. प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाने एकमेकांचे प्रश्न खोडून काढत दोन्ही बाजू मांडल्या. निमित्त होते वाद-विवाद स्पर्धेचे. सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याविषयी सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे. मानवाला लागणाऱ्या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्राकडून करून घेण्यास सुरुवात झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या आडून अनेकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या जातील. चुकीच्या पद्धतीने सर्व यंत्रणा राबविण्यात येईल. त्यामुळे हे तंत्रज्ञान मानव समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारे ठरेल, अशी एक बाजू काही विद्यार्थ्यांनी मांडली. समर्थनात अनेकांनी तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे मानवाचे जीवन कसे सुसह्य बनले आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाने मानवाच्या विकासात हातभार लावला असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण