शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पीक पद्धती बनवा

By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST

औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही.

औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना कृषी क्षेत्राची मोठ्या बाजारपेठेशी प्रभावी पद्धतीने सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच शासनाने तालुकानिहाय आदर्श पद्धती निश्चित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे मत कृषी परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू म्हणाले, हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस, गारपीट तसेच अतिउष्ण तापमान, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, अशा घटनांचे प्रमाण वाढते आहे. शिवाय मागील काही वर्षांत मराठवाड्यात पीक पद्धतीही अचानकपणे मोठ्या प्रमाणात बदलत गेली. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत गेला. म्हणून आता आदर्श पीक पद्धती तयार करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. संरक्षित शेतीस प्रोत्साहन द्यावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, शेती व्यवसायातील जोखमीचे दुष्परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागतात. शेतीतील विविध प्रकारची जोखीम कमी करण्यावर भर द्यावा लागेल. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. विविध शेती औजारे भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. कृषी रसायन मृदशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी चांगल्या उत्पन्नासाठी शेतजमिनीची तसेच जमिनीच्या सामूची ओळख करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कोरडवाहू भागात वनशेती तसेच फलोत्पादनास मोठी संधी असून अंबा, अंजीर, डाळिंब, आवळा, सीताफळ तसेच चिंच यासारख्या फळांचे उत्पन्न घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास ते शेतकऱ्यांना नक्कीच नफा मिळवून देणारे ठरतील, असे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी शेतीतील विविध जोखमींचे घटक कमी करण्याची गरज व्यक्त केली. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या प्रा. एच. एम. देसरडा यांनी तज्ज्ञांना आणि आयोजकांना खडे बोल सुनावले. कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होईल, असे काही तरी करा, असे देसरडा म्हणाले.