शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

आदर्श पीक पद्धती बनवा

By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST

औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही.

औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना कृषी क्षेत्राची मोठ्या बाजारपेठेशी प्रभावी पद्धतीने सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच शासनाने तालुकानिहाय आदर्श पद्धती निश्चित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे मत कृषी परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू म्हणाले, हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस, गारपीट तसेच अतिउष्ण तापमान, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, अशा घटनांचे प्रमाण वाढते आहे. शिवाय मागील काही वर्षांत मराठवाड्यात पीक पद्धतीही अचानकपणे मोठ्या प्रमाणात बदलत गेली. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत गेला. म्हणून आता आदर्श पीक पद्धती तयार करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. संरक्षित शेतीस प्रोत्साहन द्यावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, शेती व्यवसायातील जोखमीचे दुष्परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागतात. शेतीतील विविध प्रकारची जोखीम कमी करण्यावर भर द्यावा लागेल. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. विविध शेती औजारे भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. कृषी रसायन मृदशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी चांगल्या उत्पन्नासाठी शेतजमिनीची तसेच जमिनीच्या सामूची ओळख करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कोरडवाहू भागात वनशेती तसेच फलोत्पादनास मोठी संधी असून अंबा, अंजीर, डाळिंब, आवळा, सीताफळ तसेच चिंच यासारख्या फळांचे उत्पन्न घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास ते शेतकऱ्यांना नक्कीच नफा मिळवून देणारे ठरतील, असे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी शेतीतील विविध जोखमींचे घटक कमी करण्याची गरज व्यक्त केली. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या प्रा. एच. एम. देसरडा यांनी तज्ज्ञांना आणि आयोजकांना खडे बोल सुनावले. कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होईल, असे काही तरी करा, असे देसरडा म्हणाले.