शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आदर्श पीक पद्धती बनवा

By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST

औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही.

औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना कृषी क्षेत्राची मोठ्या बाजारपेठेशी प्रभावी पद्धतीने सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच शासनाने तालुकानिहाय आदर्श पद्धती निश्चित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे मत कृषी परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू म्हणाले, हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस, गारपीट तसेच अतिउष्ण तापमान, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, अशा घटनांचे प्रमाण वाढते आहे. शिवाय मागील काही वर्षांत मराठवाड्यात पीक पद्धतीही अचानकपणे मोठ्या प्रमाणात बदलत गेली. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत गेला. म्हणून आता आदर्श पीक पद्धती तयार करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. संरक्षित शेतीस प्रोत्साहन द्यावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, शेती व्यवसायातील जोखमीचे दुष्परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागतात. शेतीतील विविध प्रकारची जोखीम कमी करण्यावर भर द्यावा लागेल. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. विविध शेती औजारे भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. कृषी रसायन मृदशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी चांगल्या उत्पन्नासाठी शेतजमिनीची तसेच जमिनीच्या सामूची ओळख करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कोरडवाहू भागात वनशेती तसेच फलोत्पादनास मोठी संधी असून अंबा, अंजीर, डाळिंब, आवळा, सीताफळ तसेच चिंच यासारख्या फळांचे उत्पन्न घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास ते शेतकऱ्यांना नक्कीच नफा मिळवून देणारे ठरतील, असे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी शेतीतील विविध जोखमींचे घटक कमी करण्याची गरज व्यक्त केली. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या प्रा. एच. एम. देसरडा यांनी तज्ज्ञांना आणि आयोजकांना खडे बोल सुनावले. कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होईल, असे काही तरी करा, असे देसरडा म्हणाले.