शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

शेतकऱ्यांची कमी होणारी संख्या हेच मोठे कृषी संकट होय : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:24 IST

‘पाणी’ हे महासंकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदेशात आजपर्यंत ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली देशात दररोज २ हजार शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे.

औरंगाबाद : देशात आजपर्यंत ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता तर आत्महत्यांची नोंद करणेही सरकारने सोडून दिले आहे. देशात दररोज २ हजार शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. झपाट्याने कमी होणारी संख्या हेच देशासमोरील मोठे कृषी संकट आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी येथे दिला. 

एमजीएममधील पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित ‘हवामान बदल आणि शेती व्यवस्था’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्राचार्या रेखा शेळके यांची उपस्थिती होती. साईनाथ पुढे म्हणाले की, या देशात ५३ टक्के शेतकरी आहेत, असे म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्षात पूर्णवेळ शेती करणारे शेतकरी लोकसंख्येच्या फक्त ८ टक्के एवढेच आहेत, तर  सहा महिने, तीन महिने, असे हंगामानुसार शेती करणारे शेतकरी व शेतमजूर मिळून २२ टक्के संख्या होते. यातील शेतीत काम करणाऱ्या ६५ टक्के महिलाच आहेत. देशातील ६९ टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात; पण ग्रामीणची व्याख्याच करण्यात आली नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला. 

पाणी’ हे महासंकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या आशिया खंडातील देशांमध्ये सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर कोल्हापूर, सांगलीत महापूर, तर मराठवाड्यात दुष्काळ, असा विरोधाभास आहे. पाणी कमी असतानाही जास्त पाणी लागणारे ऊस, कपाशी, सोयाबीनसारखी नगदी पिके घेतली जातात. मात्र, आता पीक पद्धत बदलणे आवश्यक आहे. कमी पाणी लागणाऱ्या ज्वारी, बाजरीसारख्या पिकांकडे पुन्हा वळावे लागणार आहे. रासायनिक खतांचा अति वापरही टाळावा लागणार आहे. बीटी बियाणे महागड्या किमतीत विकून कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठी लूट केली आहे, याचीही त्यांनी उदाहरणासह मांडणी केली. जागतिक तापमान वाढीचा देशातील विविध भागांत कसा परिणाम होत आहे हे सांगताना त्यांनी जंगलातील प्राण्यांवरही त्याचा किती मोठा परिणाम होऊ लागला, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कपाशीला पांढरे सोने म्हटले जाते, हे किती फसवे आहे, हे त्यांनी सोन्याचे सतत वाढलेले भाव व कपाशीच्या भावातील घट याची तुलना करून त्यांनी स्पष्ट करून दाखविले. 

शेती प्रश्नावर २१ दिवसांचे अधिवेशन पी. साईनाथ यांनी मागणी केली की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २१ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. या कालावधीत ३ दिवस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, २ दिवस महिला शेतकरी, मजुरांचे अधिकार, तसेच अन्य दिवसांत पीक विमा, पीक कर्ज, पाणी संकट, दलित, अदिवाशांचे फॉरेस्ट राईट, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात यावी. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याenvironmentपर्यावरणRainपाऊसWaterपाणी