शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

शेतकऱ्यांची कमी होणारी संख्या हेच मोठे कृषी संकट होय : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:24 IST

‘पाणी’ हे महासंकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदेशात आजपर्यंत ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली देशात दररोज २ हजार शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे.

औरंगाबाद : देशात आजपर्यंत ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता तर आत्महत्यांची नोंद करणेही सरकारने सोडून दिले आहे. देशात दररोज २ हजार शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. झपाट्याने कमी होणारी संख्या हेच देशासमोरील मोठे कृषी संकट आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी येथे दिला. 

एमजीएममधील पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित ‘हवामान बदल आणि शेती व्यवस्था’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्राचार्या रेखा शेळके यांची उपस्थिती होती. साईनाथ पुढे म्हणाले की, या देशात ५३ टक्के शेतकरी आहेत, असे म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्षात पूर्णवेळ शेती करणारे शेतकरी लोकसंख्येच्या फक्त ८ टक्के एवढेच आहेत, तर  सहा महिने, तीन महिने, असे हंगामानुसार शेती करणारे शेतकरी व शेतमजूर मिळून २२ टक्के संख्या होते. यातील शेतीत काम करणाऱ्या ६५ टक्के महिलाच आहेत. देशातील ६९ टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात; पण ग्रामीणची व्याख्याच करण्यात आली नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला. 

पाणी’ हे महासंकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या आशिया खंडातील देशांमध्ये सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर कोल्हापूर, सांगलीत महापूर, तर मराठवाड्यात दुष्काळ, असा विरोधाभास आहे. पाणी कमी असतानाही जास्त पाणी लागणारे ऊस, कपाशी, सोयाबीनसारखी नगदी पिके घेतली जातात. मात्र, आता पीक पद्धत बदलणे आवश्यक आहे. कमी पाणी लागणाऱ्या ज्वारी, बाजरीसारख्या पिकांकडे पुन्हा वळावे लागणार आहे. रासायनिक खतांचा अति वापरही टाळावा लागणार आहे. बीटी बियाणे महागड्या किमतीत विकून कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठी लूट केली आहे, याचीही त्यांनी उदाहरणासह मांडणी केली. जागतिक तापमान वाढीचा देशातील विविध भागांत कसा परिणाम होत आहे हे सांगताना त्यांनी जंगलातील प्राण्यांवरही त्याचा किती मोठा परिणाम होऊ लागला, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कपाशीला पांढरे सोने म्हटले जाते, हे किती फसवे आहे, हे त्यांनी सोन्याचे सतत वाढलेले भाव व कपाशीच्या भावातील घट याची तुलना करून त्यांनी स्पष्ट करून दाखविले. 

शेती प्रश्नावर २१ दिवसांचे अधिवेशन पी. साईनाथ यांनी मागणी केली की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २१ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. या कालावधीत ३ दिवस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, २ दिवस महिला शेतकरी, मजुरांचे अधिकार, तसेच अन्य दिवसांत पीक विमा, पीक कर्ज, पाणी संकट, दलित, अदिवाशांचे फॉरेस्ट राईट, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात यावी. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याenvironmentपर्यावरणRainपाऊसWaterपाणी