शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शेतकऱ्यांची कमी होणारी संख्या हेच मोठे कृषी संकट होय : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:24 IST

‘पाणी’ हे महासंकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदेशात आजपर्यंत ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली देशात दररोज २ हजार शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे.

औरंगाबाद : देशात आजपर्यंत ३ लाख १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता तर आत्महत्यांची नोंद करणेही सरकारने सोडून दिले आहे. देशात दररोज २ हजार शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. झपाट्याने कमी होणारी संख्या हेच देशासमोरील मोठे कृषी संकट आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी येथे दिला. 

एमजीएममधील पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित ‘हवामान बदल आणि शेती व्यवस्था’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्राचार्या रेखा शेळके यांची उपस्थिती होती. साईनाथ पुढे म्हणाले की, या देशात ५३ टक्के शेतकरी आहेत, असे म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्षात पूर्णवेळ शेती करणारे शेतकरी लोकसंख्येच्या फक्त ८ टक्के एवढेच आहेत, तर  सहा महिने, तीन महिने, असे हंगामानुसार शेती करणारे शेतकरी व शेतमजूर मिळून २२ टक्के संख्या होते. यातील शेतीत काम करणाऱ्या ६५ टक्के महिलाच आहेत. देशातील ६९ टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात; पण ग्रामीणची व्याख्याच करण्यात आली नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला. 

पाणी’ हे महासंकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या आशिया खंडातील देशांमध्ये सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर कोल्हापूर, सांगलीत महापूर, तर मराठवाड्यात दुष्काळ, असा विरोधाभास आहे. पाणी कमी असतानाही जास्त पाणी लागणारे ऊस, कपाशी, सोयाबीनसारखी नगदी पिके घेतली जातात. मात्र, आता पीक पद्धत बदलणे आवश्यक आहे. कमी पाणी लागणाऱ्या ज्वारी, बाजरीसारख्या पिकांकडे पुन्हा वळावे लागणार आहे. रासायनिक खतांचा अति वापरही टाळावा लागणार आहे. बीटी बियाणे महागड्या किमतीत विकून कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठी लूट केली आहे, याचीही त्यांनी उदाहरणासह मांडणी केली. जागतिक तापमान वाढीचा देशातील विविध भागांत कसा परिणाम होत आहे हे सांगताना त्यांनी जंगलातील प्राण्यांवरही त्याचा किती मोठा परिणाम होऊ लागला, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कपाशीला पांढरे सोने म्हटले जाते, हे किती फसवे आहे, हे त्यांनी सोन्याचे सतत वाढलेले भाव व कपाशीच्या भावातील घट याची तुलना करून त्यांनी स्पष्ट करून दाखविले. 

शेती प्रश्नावर २१ दिवसांचे अधिवेशन पी. साईनाथ यांनी मागणी केली की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २१ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. या कालावधीत ३ दिवस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, २ दिवस महिला शेतकरी, मजुरांचे अधिकार, तसेच अन्य दिवसांत पीक विमा, पीक कर्ज, पाणी संकट, दलित, अदिवाशांचे फॉरेस्ट राईट, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात यावी. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याenvironmentपर्यावरणRainपाऊसWaterपाणी