शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

मैत्रेयेच्या संचालिका वर्षा सतपाळकर हिस पोलीस करणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:36 PM

नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे.

औरंगाबाद : कमी कालावधीत जास्तीचा मोबदला देण्याचे अमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांना गंडविल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांकडे तीन वर्षापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा सतपाळकरवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील मैत्रेय कंपनीने लाखो लोकांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवायला लावून त्यांना कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखविले. मल्टी लेवल मार्केटींग पद्धतीने काम करणा-या या कंपनीने हजारो एजंट नियुक्त केले. या एजंटांना वाढिव कमिशन आणि वरिष्ठ पद देण्याचे अमिष दाखवून जास्तीत जास्त  लोकांना गुंतवणुक करायला लावण्याचे टार्गेट दिले जात. एजंटांनीही जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना मैत्रेय मध्ये गुंतवणुक करायला लावले. या कंपनीकडे गुंतवणुक करणा-याच्या विविध प्लॅन होते. विशेष म्हणजे मासिक तत्वावरही कंपनीकडून गुंतवणुक स्विकारली जात. प्रत्येक गुंतवणुकदाराला त्याची पावती आणि एक बॉण्ड मिळत. कंपनीचे उस्मानपुरा परिसरात एक अलिशान कार्यालय आहे. या कार्यालयात मोठा  कर्मचारी वर्गही होता. तीन वर्षापूर्वी हजारो गुंतवणुकदारांना मुदतीनंतरही त्यांचे पैसे मिळत नसल्याने पोलिसांत धाव घेतली. 

उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी तक्रारअर्ज नोंदविलेले आहेत. अशाचप्रकारच्या तक्रारी नाशिक, परभणी, पूर्णा आणि राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांना प्राप्त झाल्या. नाशिक  पोलिसांनी मैत्रेयच्या संचालिका सतपाळकर यांना अटक केली होती. तेव्हा त्यांनी गुंतवणुकदारांचे सर्व पैसे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली परत देण्याची तयारी न्यायालयासमोर दर्शविली होती. तेव्हा न्यायालयाच्या आदेशाने संयुक्त खाते उघडण्यात आले होते. अशाचप्रकारची कार्यवाही औरंगाबादेत करून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.

सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारसुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. यातील शेकडो गुंतवणुकदार असे आहेत की, मुदतीनंतर एजंटांच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांना मिळणारी सर्व रक्कम पुन्हा कंपनीत गुंतवली. अशा सर्व लोकांनी पोलिसांत धाव घेतलेली आहे. आर्थिक गुन्हेशाखेकडे या केसची कागदपत्रे  अद्याप आलेली नाही.