शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:06 IST

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी सातत्याने सत्यशोधक समाजाच्या सभा, बैठकींना महात्मा फुलेंची हजेरी

- विकास राऊत

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ) या समतेच्या मार्गाने जाणाऱ्या शांतीदूतांनी औरंगाबाद ते पैठण या रस्त्याची पहिल्यांदा पायाभरणी केली ती १८७० च्या दशकात. सत्यशोधक चळवळीचे केंद्र आणि नाथनगरीकडे जाण्यासाठी पुणे कमर्शियल ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीकडून महात्मा फुले यांनी निजाम संस्थानाच्या काळात त्या रस्त्याचे काम केले. (The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule) 

यानिमित्ताने महात्मा फुले यांचा मराठवाड्यात पदस्पर्श झाला. पुढे कन्नड, जालना, चौसाळा, उदगीर, निलंग्यासह पूर्ण मराठवाड्यात सत्यशोधक समाज ही चळवळ वाढली, त्या निमित्ताने फुले यांचे या विभागात येणे-जाणे राहिले. पुण्यावरून औरंगाबादकडे येताना वन गार्डन पूल १८६९ साली बांधण्यात आला. कात्रजचा बोगदा त्यांच्या कंपनीने बांधला आहे. त्यांच्या कंपनीने राज्यभर रस्त्यांची कामे केली. सयाजी महाराजांचा बडोद्यातील राजवाडा, मुंबई मनपाचे मुख्यालय, एका इंग्रजी वृत्तपत्राचे मुंबईतील कार्यालय, राज्यातील काही धरणांची व कालव्यांची कामेदेखील महात्मा फुले यांच्या कंपनीने केली.

मराठवाडा सत्यशोधक चळवळीचे मोठे केंद्रमराठवाड्याशी फुले यांचा तीनप्रकरणी संबंध आला. सत्यशोधक चळवळ उभी राहिली, त्यावेळी मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. उमरगा, लातूर, उदगीर, उस्मानाबाद, नांदेडपर्यंत सत्यशोधक समाजाची आंदोलने, मेळावे झाले. बीड जिल्ह्यात चौसाळा येथे सत्यशोधक चळवळीचे जलसे होत. जालना, कन्नड ही चळवळीची केंद्रे राहिली. ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ आणि ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा’ ही दोन्ही पुस्तके शासनाने प्रकाशित केली असून त्यामध्ये फुले यांचा मराठवाड्याशी संबंध व औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामाचे विवेचन आहे.- प्रा. हरी नरके, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक

१८७० च्या दशकांत पैठण रस्त्याचे कामफुले यांच्या कंपनीने निजाम स्टेटकडून काम घेतले होते. पहिल्यांदा त्या रस्त्याचे काम महात्मा फुले यांनी केले. कन्नड येथे सत्यशोधक समाजाची बैठक झाली होती, त्या बैठकीला स्वत: फुले यांनी मार्गदर्शन केले होते. सत्यशोधक जलशांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चौसाळा येथे काम काही जण करीत असत. तेथून सत्यशोधक चळवळीचा मराठवाड्यात प्रसार झाला. निलंगा, उमरग्यातून आलेले कृष्णाजी भालेकर (जे फुले यांचे अनुयायी होते), यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालविले.- डॉ. वि. ल. धारूरकर, सेवानिवृत्त प्रपाठक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाMarathwadaमराठवाडा