शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:06 IST

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी सातत्याने सत्यशोधक समाजाच्या सभा, बैठकींना महात्मा फुलेंची हजेरी

- विकास राऊत

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ) या समतेच्या मार्गाने जाणाऱ्या शांतीदूतांनी औरंगाबाद ते पैठण या रस्त्याची पहिल्यांदा पायाभरणी केली ती १८७० च्या दशकात. सत्यशोधक चळवळीचे केंद्र आणि नाथनगरीकडे जाण्यासाठी पुणे कमर्शियल ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीकडून महात्मा फुले यांनी निजाम संस्थानाच्या काळात त्या रस्त्याचे काम केले. (The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule) 

यानिमित्ताने महात्मा फुले यांचा मराठवाड्यात पदस्पर्श झाला. पुढे कन्नड, जालना, चौसाळा, उदगीर, निलंग्यासह पूर्ण मराठवाड्यात सत्यशोधक समाज ही चळवळ वाढली, त्या निमित्ताने फुले यांचे या विभागात येणे-जाणे राहिले. पुण्यावरून औरंगाबादकडे येताना वन गार्डन पूल १८६९ साली बांधण्यात आला. कात्रजचा बोगदा त्यांच्या कंपनीने बांधला आहे. त्यांच्या कंपनीने राज्यभर रस्त्यांची कामे केली. सयाजी महाराजांचा बडोद्यातील राजवाडा, मुंबई मनपाचे मुख्यालय, एका इंग्रजी वृत्तपत्राचे मुंबईतील कार्यालय, राज्यातील काही धरणांची व कालव्यांची कामेदेखील महात्मा फुले यांच्या कंपनीने केली.

मराठवाडा सत्यशोधक चळवळीचे मोठे केंद्रमराठवाड्याशी फुले यांचा तीनप्रकरणी संबंध आला. सत्यशोधक चळवळ उभी राहिली, त्यावेळी मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. उमरगा, लातूर, उदगीर, उस्मानाबाद, नांदेडपर्यंत सत्यशोधक समाजाची आंदोलने, मेळावे झाले. बीड जिल्ह्यात चौसाळा येथे सत्यशोधक चळवळीचे जलसे होत. जालना, कन्नड ही चळवळीची केंद्रे राहिली. ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ आणि ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा’ ही दोन्ही पुस्तके शासनाने प्रकाशित केली असून त्यामध्ये फुले यांचा मराठवाड्याशी संबंध व औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामाचे विवेचन आहे.- प्रा. हरी नरके, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक

१८७० च्या दशकांत पैठण रस्त्याचे कामफुले यांच्या कंपनीने निजाम स्टेटकडून काम घेतले होते. पहिल्यांदा त्या रस्त्याचे काम महात्मा फुले यांनी केले. कन्नड येथे सत्यशोधक समाजाची बैठक झाली होती, त्या बैठकीला स्वत: फुले यांनी मार्गदर्शन केले होते. सत्यशोधक जलशांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चौसाळा येथे काम काही जण करीत असत. तेथून सत्यशोधक चळवळीचा मराठवाड्यात प्रसार झाला. निलंगा, उमरग्यातून आलेले कृष्णाजी भालेकर (जे फुले यांचे अनुयायी होते), यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालविले.- डॉ. वि. ल. धारूरकर, सेवानिवृत्त प्रपाठक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाMarathwadaमराठवाडा