शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:06 IST

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी सातत्याने सत्यशोधक समाजाच्या सभा, बैठकींना महात्मा फुलेंची हजेरी

- विकास राऊत

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ) या समतेच्या मार्गाने जाणाऱ्या शांतीदूतांनी औरंगाबाद ते पैठण या रस्त्याची पहिल्यांदा पायाभरणी केली ती १८७० च्या दशकात. सत्यशोधक चळवळीचे केंद्र आणि नाथनगरीकडे जाण्यासाठी पुणे कमर्शियल ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीकडून महात्मा फुले यांनी निजाम संस्थानाच्या काळात त्या रस्त्याचे काम केले. (The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule) 

यानिमित्ताने महात्मा फुले यांचा मराठवाड्यात पदस्पर्श झाला. पुढे कन्नड, जालना, चौसाळा, उदगीर, निलंग्यासह पूर्ण मराठवाड्यात सत्यशोधक समाज ही चळवळ वाढली, त्या निमित्ताने फुले यांचे या विभागात येणे-जाणे राहिले. पुण्यावरून औरंगाबादकडे येताना वन गार्डन पूल १८६९ साली बांधण्यात आला. कात्रजचा बोगदा त्यांच्या कंपनीने बांधला आहे. त्यांच्या कंपनीने राज्यभर रस्त्यांची कामे केली. सयाजी महाराजांचा बडोद्यातील राजवाडा, मुंबई मनपाचे मुख्यालय, एका इंग्रजी वृत्तपत्राचे मुंबईतील कार्यालय, राज्यातील काही धरणांची व कालव्यांची कामेदेखील महात्मा फुले यांच्या कंपनीने केली.

मराठवाडा सत्यशोधक चळवळीचे मोठे केंद्रमराठवाड्याशी फुले यांचा तीनप्रकरणी संबंध आला. सत्यशोधक चळवळ उभी राहिली, त्यावेळी मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. उमरगा, लातूर, उदगीर, उस्मानाबाद, नांदेडपर्यंत सत्यशोधक समाजाची आंदोलने, मेळावे झाले. बीड जिल्ह्यात चौसाळा येथे सत्यशोधक चळवळीचे जलसे होत. जालना, कन्नड ही चळवळीची केंद्रे राहिली. ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ आणि ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा’ ही दोन्ही पुस्तके शासनाने प्रकाशित केली असून त्यामध्ये फुले यांचा मराठवाड्याशी संबंध व औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामाचे विवेचन आहे.- प्रा. हरी नरके, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक

१८७० च्या दशकांत पैठण रस्त्याचे कामफुले यांच्या कंपनीने निजाम स्टेटकडून काम घेतले होते. पहिल्यांदा त्या रस्त्याचे काम महात्मा फुले यांनी केले. कन्नड येथे सत्यशोधक समाजाची बैठक झाली होती, त्या बैठकीला स्वत: फुले यांनी मार्गदर्शन केले होते. सत्यशोधक जलशांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चौसाळा येथे काम काही जण करीत असत. तेथून सत्यशोधक चळवळीचा मराठवाड्यात प्रसार झाला. निलंगा, उमरग्यातून आलेले कृष्णाजी भालेकर (जे फुले यांचे अनुयायी होते), यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालविले.- डॉ. वि. ल. धारूरकर, सेवानिवृत्त प्रपाठक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाMarathwadaमराठवाडा