शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Maharashtra Election 2019: शहरासाठी करणार काय? जाहीर सभांमध्ये स्थानिक मुद्दे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 4:53 PM

उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करीत आहेत.

ठळक मुद्देशहराच्या सर्वांगीण विकासाकडे ‘राजकीय’ मौन.मागील ३० वर्षांमध्ये एकाही शहर विकास आराखड्यावर काम झाले नाही.शहरात पर्यटन उद्योगाला वाव मिळावा यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त सात दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांवर भर दिला आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मुख्य प्रश्नांना बगल देण्यात आली आहे. राजकीय नेते राष्ट्रीय, राज्यस्तरीय विषयांना स्पर्श करीत आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार शहरातील तिन्ही मतदारसंघांतून निवडून आल्यास काय करणार? हे ठोसपणे कोणीही सांगायला तयार नाही. उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करीत आहेत.

स्मार्ट सिटीत निवड झालेल्या औरंगाबाद शहराला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. यातील अनेक प्रश्न महापालिकेशी निगडित असल्याचे सांगून आमदार, खासदार नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत असतात. दर पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष प्रचाराचा धुराळा उडवितात. मतदारही आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवितात. नंतर पाच वर्षे काहीच होत नाही. 

२ आॅक्टोबरला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर पहिली सभा घेऊन शहरात प्रचाराचा नारळ फोडला होता. ओवेसी यांनी तब्बल ३८ मिनिटे भाषण केले होते. त्यातील २२ मिनिटे ते महात्मा गांधी, नथुराम गोडसे यांच्यावर बोलत होते. औरंगाबाद शहरातील एकाही मुख्य समस्येवर त्यांनी भाष्य केले नाही. शहरातील तीन मतदारसंघांत माझे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील यावर अवाक्षरही काढण्यात आले नाही. याचपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांस्कृतिक मंडळावर सभा झाली. त्यांनीही शहराच्या समस्यांवर विशेष भाष्य केले नाही. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना शहराची दुर्दशा काय हे सर्वश्रुत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पाणी प्रश्नावरून शिवसेना उमेदवाराची काय अवस्था झाली, हेसुद्धा औरंगाबादकरांनी पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्सूल गावात एक छोटेखानी सभा घेतली. या सभेतही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपचे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी मुकुंदवाडीत दोन दिवसांपूर्वी सभा घेतली. या सभेतही त्यांनी राष्ट्रवादी, राज्यस्तरीय विषयांवरच भाष्य केले.

शहरातील प्रमुख गंभीर समस्या कोणत्या?1.मागील ३० वर्षांमध्ये एकाही शहर विकास आराखड्यावर काम झाले नाही. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव.2. शहरात पर्यटन उद्योगाला वाव मिळावा यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. पर्यटनस्थळांवर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव.3. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न दहा वर्षांपासून रेंगाळला आहे. हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी एकाही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही.4. शहरात महिला, पुरुषांसाठी शौचालयांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. संपूर्ण शहराला भेडसावणाऱ्या या समस्यांकडे लक्ष देणार कोण?5.घाटी रुग्णालय सोडले तर एकही मोठा दवाखाना शहरात नाही. सर्व रुग्णांचा ताण घाटीवर वाढतोय.6.सिडको-हडकोसह जुन्या शहरात आजही सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो.7.शहरात मागील काही महिन्यांत खून, चोऱ्या, नशेच्या  गोळ्यांची विक्री, मंगळसूत्र पळविण्याच्या घटनांमध्ये आमूलाग्र वाढ झाली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्व