शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

Maharashtra Election 2019: विकासकामांकडे पाठ फिरवल्याने एमआयएम आली संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:45 IST

संतप्त नागरिक ठिकठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला विरोध दर्शवीत आहेत.

ठळक मुद्देनगरसेवक प्रचारातून गायब उमेदवारांसोबत नातेवाईक

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु एमआयएमला प्रचारात अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. पक्षाच्या २४ नगरसेवकांनी मागील पाच वर्षांमध्ये विकासकामांकडे पाठ फिरवली. त्यामुळे उमेदवारांना ठिकठिकाणी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अनेक नगरसेवकांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे. पक्षातील अंतर्गत कलहाचा फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडतो आहे.  

२०१४ मध्ये औरंगाबाद शहरातील मुस्लिम मतदारांनी एमआयएमला भरभरून मतदान केले. त्यामुळे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात पक्षाला यश मिळाले. त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक निवडून आले. मतदारांनी टाकलेला विश्वास एमआयएमला टिकवता आला नाही. अनेक वॉर्डांमध्ये विकासकामेच झाली नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिक ठिकठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला विरोध दर्शवीत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये, तर उमेदवारास प्रचारासाठी पायही ठेवू दिला नाही. पक्ष संकटात असताना नगरसेवक पुढे येऊन परिस्थितीचा मुकाबला करायला तयार नाहीत. उमेदवार वॉर्डात आल्यावर त्याच्यासोबत औपचारिकता म्हणून नगरसेवक फिरत आहेत. उमेदवारांची पाठ फिरली की, नगरसेवकही प्रचाराकडे पाठ फिरवीत आहेत. पक्षात नगरसेवकांचेही दोन गट पडले आहेत.

एका गटाचे नगरसेवक दुसऱ्या नेत्याचे नेतृत्व मान्य करीत नाहीत. पक्षातील अंतर्गत कलह बराच वाढला आहे. मतदानासाठी फक्त ६ दिवस शिल्लक असतानाही तिन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी १७ आॅक्टोबरपासून शहरात तळ ठोकून बसणार आहेत. पदयात्रा, जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ते आल्यानंतरच परिस्थिती सुधारेल, अशी उमेदवारांना आशा आहे. तोपर्यंत विरोधक प्रचारात बाजी मारणार आहेत.

जातीयवादी शक्तींसोबत हात मिळवणीचे परिणामएमआयएम पक्षाच्या नेत्यांनी आजपर्यंत जातीयवादी शक्तींचा कडाडून विरोधाचा आभासच निर्माण केला. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेत एमआयएमने जातीयवादी शक्तींसोबत थेट हातमिळविणीच केली.  त्याचेही परिणाम या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला त्रासदायक ठरत आहेत. स्थायी समितीचा सभापती निवडताना एमआयएमने शिवसेनेसमोर उमेदवारच उभा केला नव्हता. मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर सेना-भाजपने अविश्वास ठराव आणल्यावर एमआयएमने युतीला साथ दिली होती. अलीकडेच झालेल्या औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना एमआयएम नगरसेवकांनी मतदान केले होते.

जावेद कुरैशी फॅक्टरऔरंगाबाद मध्य विधानसभा मतदरसंघातून एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांना तिकीट मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, कुरैैशी यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अगोदर बंडखोरी केली. नंतर धर्मगुरूंच्या आदेशावरून माघारही घेतली. जावेद कुरैशी पुन्हा एमआयएम पक्षात सक्रिय होतील, असे वाटले होते. मात्र, त्यांनी पक्षापासून दूर राहणे पसंत केले आहे. गुरुवारी सायंकाळी पक्षप्रमुख शहरात येत आहेत. ते कुरैशी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम