शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चहा आणि पकोडेवाल्यांची फक्त चर्चा; प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 6:11 PM

पथविक्रेत्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देनिवडणुकीत नागरी प्रश्नांना बगलसरकारची दुटप्पी भूमिका आहे

औरंगाबाद : देशात सध्या चहावाला, पकोडेवाल्यांची चर्चा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री करीत आहेत. त्यांच्या सन्मानाविषयी बोलले जाते; परंतु दुसरीकडे फुटपाथवरील छोट्या व्यावसायिकांना हुसकावण्यात येत आहे. त्यांना बेरोजगार करण्यात येत आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे सदस्य जम्मू आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

देशात सुमारे ३ कोटी, तर महाराष्ट्रात ५ लाख पथविक्रे ते आहेत. दररोज या वर्गांची साधारण ८ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यातून हजारो पथविक्रे ते स्वत:ची उपजीविका भागवत आहेत; परंतु त्यांना बेरोजगार करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आनंद यांनी केला. निवडणुका जनतेच्या प्रश्नांवर होताना दिसत नाहीत. शिवीगाळ, नक्कल अशा अर्थहीन मुद्यांवर निवडणूक होत आहे. आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे म्हटले जाते; परंतु त्याचे मानक कोणालाही माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत नॅशनल हॉकर्स फेडरेशन औरंगाबाद मध्यचे भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्या पाठीशी असल्याचे जम्मू आनंद म्हणाले. याप्रसंगी अभय टाकसाळ, मनोहर टाकसाळ, डॉ. राम बाहेती, मधुकर खिल्लारे, किसनराज पंडित उपस्थित होते.

पथविक्रेता कायदा का लागू नाही?फेरीवाल्यांसाठी वर्ष २०१४  मध्ये पथविके्रता उपजीविका संरक्षण व पथ विक्रेय विनिमय कायदा २०१४ तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यासाठी २०१६ मध्ये नियम तयार केले आहेत. प्रत्यक्षात ३ वर्षे उलटूनही हा कायदा लागू  नाही. औरंगाबादेत हा कायदा लागू करण्यापासून कोणी रोखले, हे समोर आले पाहिजे. हा कायदा लागू केला जात नसेल तर पथविक्रेता, फेरीवाल्यांवर कारवाईचाही अधिकार नसल्याचे जम्मू आनंद म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादGovernmentसरकार