शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019 : माघारीचा ‘मंडे’; बंडोबा झाले ‘थंडे’: ७५ उमेदवारांनी मैदान सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:14 PM

१३३ उमेदवारांचा जिल्ह्यात लागणार कस

ठळक मुद्देसिल्लोडमध्ये सर्वात कमी; पूर्वमध्ये सर्वाधिक

औरंगाबाद : जिल्ह्यातील विधानसभा कुरुक्षेत्रात २०८ पैकी १३३ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचा आता विजयाच्या दिशेने कूच करण्यासाठी कस लागणार आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करून ज्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, त्यापैकी अनेकांनी माघार घेतली. माघारीचा ‘मंडे’ बंडखोरांना थंड करण्यात यशस्वी झाला. 

प्रचाराची खरी रणधुमाळी आता सुरू होईल. विधानसभेच्या कु रुक्षेत्रात उतरण्यासाठी ४ आॅक्टोबर रोजी २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची ५ आॅक्टोबर रोजी छाननी झाली. त्यात ३९ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. २०८ उमेदवार रिंगणात राहिले होते. ७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्ह्यातून तब्बल ७५ उमेदवारांनी माघार घेतल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी कळविले.  १३३ उमदेवार रिंगणात असून, सर्वाधिक ३४ उमेदवार पूर्व मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल वैजापूरमध्ये १६ उमेदवार आहेत. पैठणमध्ये १५, तर गंगापूरमध्ये १४ उमेदवार आहेत. फुलंब्रीत १३ उमेदवार आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात १२, औरंगाबाद मध्य मतदारसंघात १४, कन्नड मतदारसंघात ८, तर सर्वात कमी ७ उमेदवार सिल्लोड मतदारसंघात आहेत. 

सिल्लोडमध्ये सर्वात कमी; पूर्वमध्ये सर्वाधिकसिल्लोडमध्ये सर्वात कमी ७ उमेदवार रिंगणात आहेत, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक जास्त ३४ उमेदवार आहेत. पूर्व मतदारसंघात एकूण ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील १३ उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी पक्ष उमेदवारांना यश आले. सर्वाधिक उमेदवार गंगापूर मतदारसंघातून बाहेर पडले. २९ पैकी १५ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातूनही ९ उमेदवारांनी माघार घेतली. सिल्लोड मतदारसंघातून १३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडले. 

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील उमेदवारमतदारसंघ    उमेदवारांची संख्या    माघार घेतलेले  उमेदवारसिल्लोड    ७    १३कन्नड    ८    ६फुलंब्री    १३    ७औरंगाबाद मध्य    १४    ९औरंगाबाद पश्चिम    १२    १औरंगाबाद पूर्व    ३४    १३पैठण    १५    ४गंगापूर    १४    १५वैजापूर    १६    ७एकूण    १३३    ७५

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण