शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:36 IST

परळीत फाईट चांगलीच होणार

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा सावध पवित्रा 

औरंगाबाद : ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’असे आपण कधीही म्हटलेलो नाही. एका ठिकाणच्या सभेत पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपंकजा मुंडे होतील, असे भाकित केले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचेही स्पष्ट झालेले होते. त्यावेळेपासून आपणाला ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’  हे लागलेले विशेषण काही पाठ सोडत नाही, असा सावध पवित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत घेतला.

मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

‘नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजप कटीबद्ध’ या मोहिमेतंर्गत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यात बोलताना त्यांनी भाजप सरकारने पाच  वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या आकडेवारींची माहिती सादर केली. या माहितीनंतर नुकत्याच झालेल्या सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील मेळाव्यात पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. अमित शहा यांचे भाषण सुरु झाल्यानंतर जनतेमधून सतत ‘ पंकजा मुंडे सीएम, पंकजा मुंडे सीएम’ च्या घोषणा देण्यात येत होत्या. याविषयी त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, घोषणा देणारे पदाधिकारी नव्हते. तसेच माझ्याही ओळखीचे नव्हते किंवा मी नियोजितही केलेले नव्हते. त्याला माज्या लेखी काहीही महत्व नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लोक आलेले होते. त्यांच्या ज्या भावना होत्या. त्याची दखल पक्षाध्यक्षांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

केलेल्या कामांबद्दल नेतृत्वाला कौतुक औरंगाबादेतील मेळाव्याला पंतप्रधान, सावरगावला गृहमंत्री आणि आता परळीत प्रचारासाठी पंतप्रधान येणार आहेत. तेव्हा आपणाला भाजप नेतृत्व ओबीसी नेत्या म्हणून सादर करत आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी भाजपात असे काही होत नसते. आपण केलेल्या कामांबद्दल नेतृत्वाला कौतुक असल्यामुळे असे होत असेल, असेही त्यांनी सांगितले.

परळी विधानसभेत टफ फाईट होणारपरळी विधानसभा मतदारसंघात फाईट चांगलीच टफ होणार आहे.  लोकशाहीमध्ये एकतर्फी निवडणूक होत नसते. धनंजयसह इतरही उमेदवार आहे. त्यामुळे अतिआत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. दोन वेळा बहिणीला दिले आता एकदा भावाला निवडून द्या असे आवाहन धनंजय मुंडे करत असल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी परळी ही काही आमची जहागिरी नाही. एकदा बहिणीला, एकदा भावाला असे काही नसते. जो कामे करेल त्याला लोक संधी देतील, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीparli-acपरळी