शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 23:45 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटलं होतं. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नाव करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरेंची होती, ती पूर्ण केल्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ही इच्छा पूर्ण करताच, सर्वात जास्त दुःख काँग्रेसला झाले, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. आता उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. "काँग्रेसच्या काळात हे नाव बदलण्याची हिंमत कोणीही केली नाही. परंतु महायुती सरकार येताच छत्रपती संभाजीनगर हे नाव केले. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण केली," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  

"पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय थापा मारल्या हे अंबादास दानवेंनी तुम्हाला सांगितलं. पण विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी म्हणाले की मिंध्यांनी या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केलं. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न त्यांनी साकार केलं. सगळ्यात आधी सांगतोय बाळासाहेब बोलू नका ते हिंदुहृदयसम्राट आहेत होते आणि राहणार. ते तुमचे वर्गमित्र नव्हते. पण तुमच्या आठवणीसाठी सांगतो छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्याचे नामकरण हे मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

"छत्रपती संभाजीनगर नाव हे त्यांनी केलं असं मोदींचं म्हणणं असेल तर मग आता छत्रपती संभाजीनगर कुठे आहे. ज्या तत्परतेने तुमचे नोकर निवडणूक आयोग त्यांनी माझ्या पक्षाचे नाव चोरून दरोडेखोरांना दिलं. ती तत्परता माझ्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करायला का तयार नाही. का अजून नामांतर झालेले नाही. अजूनही मतपत्रिकेवर किंवा मतदार संघाच्या यादीत या जिल्ह्याचे नाव औरंगाबाद आहे मग मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेलात. बाळासाहेबांचे स्वप्न एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलं असं ते म्हणत आहे ठीक आहे क्षणभर मानलं. मग नवाज शरीफांच्याचा वाढदिवसाचा केक खाऊन आलात हे सुद्धा बाळासाहेबांचे स्वप्न होते का," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

"महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन जातात हे सुद्धा बाळासाहेबांचे स्वप्न होतं का? मी मुख्यमंत्री असताना याच संभाजीनगरमध्ये मेडिकल डिवाइस पार्क आणत होतो कुठे गेला तो प्रकल्प? यातून किती जणांना रोजगार मिळाला असता याचा तुम्हाला अंदाज आहे का? हा प्रकल्प इथे आला असता तर मराठवाड्यातील किमान एक लाख तरुणांना रोजगार मिळाला असता, तो तुम्ही गुजरातला घेऊन गेलात आणि हिंदुहृदयसम्राट यांचे स्वप्न म्हणून तुम्ही आम्हाला थापा मारता," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी