शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्यातून तीन महिला आमदार विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 15:44 IST

विधानसभा निवडणूक - १९५७ : मराठी व गुजराती भाषा बोलणाऱ्यांच्या द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्याचा समावेश

ठळक मुद्देमुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवारत्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : भाषावार प्रांतरचनेचे सूत्र मान्य होऊनही महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई हे द्विभाषिक राज्य स्थापन झाले. १९५७ मध्ये झालेल्या या निवडणुकीपूर्वी हैदराबाद राज्यातील मराठवाडा व मध्यप्रदेशातील विदर्भ, गुजरात व सौराष्ट्र वेगळे काढून मुंबई राज्याला जोडले गेले. ३३९ आमदारांच्या या विधानसभेत मराठवाड्यातून तीन महिला आमदारांना जाण्याची संधी मिळाली. १९५२ च्या पहिल्याच निवडणुकीत वैजापुरातून विजयी झालेल्या आशाताई आनंदराव वाघमारे यांना मात्र दुसऱ्य निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. 

नव्यानेच स्वतंत्र झालेल्या भारतात या काळात राज्यनिर्मितीची प्रक्रिया वेगात होती. फाजल अली आयोगाने केलेल्या सूचनांनुसार भाषावार प्रांतरचना करण्याचे सूत्र स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार मराठी भाषा बोलणाऱ्य मराठवाडा व विदर्भाला मुंबई राज्याला जोडण्यात आले. त्यामुळे दुसऱ्य निवडणुकीनंतर औरंगाबादसह मराठवाड्यातील आमदारांना हैदराबादऐवजी मुंबई विधानसभेत समाविष्ट करण्यात आले. 

औरंगाबाद शहरातून काँग्रेसचे मीर महमूद अली यांना मतदारांनी मुंबई राज्याच्या विधानसभेत पाठविले. पीजंट वर्कर्स पार्टीचे काजी सलिमोद्दीन यांचा मीर महमूद यांनी पराभव केला होता. तेव्हा औरंगाबाद शहराचे एकूण मतदार होते फक्त ५२ हजार १७५. त्यातील १६ हजार ६८७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. मीर महमूद यांना १० हजार ४७५ मते मिळाली. 

विद्यमान दोन आमदार पराभूत, एक विजयीमराठवाडा हैदराबाद राज्यात समाविष्ट असताना  १९५२ मध्ये  विधानसभेची पहिली  निवडणूक झाली. तीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रामगोपाल रामकिसन नावदार हे विजयी झाले होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसरी निवडणूक नावदार यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर गंगापूर मतदारसंघातून लढविली; परंतु सीपीआयचे दिगंबरदास चंद्रगुप्ता यांनी त्यांचा केवळ ६१ मतांनी निसटता पराभव केला होता. याचप्रमाणे काँग्रेसच्या आशाताई वाघमारे यांचा पीएसपीचे रामचंद्र महिंद्रनाथ यांनी १९११ मतांनी पराभव केला. नागोराव विश्वनाथराव पाठक यांनी मात्र सतत दुसऱ्यंदा विजय मिळविला. ते दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवारीवर सिल्लोड मतदारसंघातून लढले होते. सतत दुसऱ्यंदा आमदारकीचा मान मिळविणारे ते जिल्ह्यातून पहिले आमदार ठरले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार : १९५७विधानसभा मतदारसंघ     विजयी उमेदवार    पक्ष       प्राप्त मतेऔरंगाबाद    मीर महमूद अली                काँग्रेस     १०४७५पैठण    व्यंकटराव जाधव                काँग्रेस            १२२१३गंगापूर     दिगंबरदास चंद्रगुप्ता            सीपीआय        १००५५वैजापूर    महेंद्रनाथ रामचंद्र                 पीएसपी        १४९१८कन्नड     बाबूराव माणिकराव    काँग्रेस         ११५६९सिल्लोड    नागोराव विश्वनाथ पाठक    काँग्रेस       १२५९८    जालना (राखीव)    धोंडिराम गणपतराव    काँग्रेस         १९९२६जालना (सर्वसाधारण)    रुस्तुमजी बेजॉनजी    काँग्रेस           १७९९०अंबड     नाना जेधे         काँग्रेस            ११२३०भोकरदन    भगवंतराव गाडे        काँग्रेस             १४१६१

मराठवाड्यातील महिला आमदारमराठवाड्यातून ४ महिलांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती, हे विशेष. चारपैकी तिघी विजयी झाल्या. त्यात शांताबाई रतनलाल (बीड), ताराबाई मानसिंग (कळंब- एससी राखीव) व अंजनाबाई जयवंतराव (हादगाव) यांचा समावेश होता. वैजापूरच्या तत्कालीन आमदार आशाताई आनंदराव वाघमारे यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. मुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवार होत्या. त्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद