शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्यातून तीन महिला आमदार विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 15:44 IST

विधानसभा निवडणूक - १९५७ : मराठी व गुजराती भाषा बोलणाऱ्यांच्या द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्याचा समावेश

ठळक मुद्देमुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवारत्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : भाषावार प्रांतरचनेचे सूत्र मान्य होऊनही महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई हे द्विभाषिक राज्य स्थापन झाले. १९५७ मध्ये झालेल्या या निवडणुकीपूर्वी हैदराबाद राज्यातील मराठवाडा व मध्यप्रदेशातील विदर्भ, गुजरात व सौराष्ट्र वेगळे काढून मुंबई राज्याला जोडले गेले. ३३९ आमदारांच्या या विधानसभेत मराठवाड्यातून तीन महिला आमदारांना जाण्याची संधी मिळाली. १९५२ च्या पहिल्याच निवडणुकीत वैजापुरातून विजयी झालेल्या आशाताई आनंदराव वाघमारे यांना मात्र दुसऱ्य निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. 

नव्यानेच स्वतंत्र झालेल्या भारतात या काळात राज्यनिर्मितीची प्रक्रिया वेगात होती. फाजल अली आयोगाने केलेल्या सूचनांनुसार भाषावार प्रांतरचना करण्याचे सूत्र स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार मराठी भाषा बोलणाऱ्य मराठवाडा व विदर्भाला मुंबई राज्याला जोडण्यात आले. त्यामुळे दुसऱ्य निवडणुकीनंतर औरंगाबादसह मराठवाड्यातील आमदारांना हैदराबादऐवजी मुंबई विधानसभेत समाविष्ट करण्यात आले. 

औरंगाबाद शहरातून काँग्रेसचे मीर महमूद अली यांना मतदारांनी मुंबई राज्याच्या विधानसभेत पाठविले. पीजंट वर्कर्स पार्टीचे काजी सलिमोद्दीन यांचा मीर महमूद यांनी पराभव केला होता. तेव्हा औरंगाबाद शहराचे एकूण मतदार होते फक्त ५२ हजार १७५. त्यातील १६ हजार ६८७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. मीर महमूद यांना १० हजार ४७५ मते मिळाली. 

विद्यमान दोन आमदार पराभूत, एक विजयीमराठवाडा हैदराबाद राज्यात समाविष्ट असताना  १९५२ मध्ये  विधानसभेची पहिली  निवडणूक झाली. तीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रामगोपाल रामकिसन नावदार हे विजयी झाले होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसरी निवडणूक नावदार यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर गंगापूर मतदारसंघातून लढविली; परंतु सीपीआयचे दिगंबरदास चंद्रगुप्ता यांनी त्यांचा केवळ ६१ मतांनी निसटता पराभव केला होता. याचप्रमाणे काँग्रेसच्या आशाताई वाघमारे यांचा पीएसपीचे रामचंद्र महिंद्रनाथ यांनी १९११ मतांनी पराभव केला. नागोराव विश्वनाथराव पाठक यांनी मात्र सतत दुसऱ्यंदा विजय मिळविला. ते दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवारीवर सिल्लोड मतदारसंघातून लढले होते. सतत दुसऱ्यंदा आमदारकीचा मान मिळविणारे ते जिल्ह्यातून पहिले आमदार ठरले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार : १९५७विधानसभा मतदारसंघ     विजयी उमेदवार    पक्ष       प्राप्त मतेऔरंगाबाद    मीर महमूद अली                काँग्रेस     १०४७५पैठण    व्यंकटराव जाधव                काँग्रेस            १२२१३गंगापूर     दिगंबरदास चंद्रगुप्ता            सीपीआय        १००५५वैजापूर    महेंद्रनाथ रामचंद्र                 पीएसपी        १४९१८कन्नड     बाबूराव माणिकराव    काँग्रेस         ११५६९सिल्लोड    नागोराव विश्वनाथ पाठक    काँग्रेस       १२५९८    जालना (राखीव)    धोंडिराम गणपतराव    काँग्रेस         १९९२६जालना (सर्वसाधारण)    रुस्तुमजी बेजॉनजी    काँग्रेस           १७९९०अंबड     नाना जेधे         काँग्रेस            ११२३०भोकरदन    भगवंतराव गाडे        काँग्रेस             १४१६१

मराठवाड्यातील महिला आमदारमराठवाड्यातून ४ महिलांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती, हे विशेष. चारपैकी तिघी विजयी झाल्या. त्यात शांताबाई रतनलाल (बीड), ताराबाई मानसिंग (कळंब- एससी राखीव) व अंजनाबाई जयवंतराव (हादगाव) यांचा समावेश होता. वैजापूरच्या तत्कालीन आमदार आशाताई आनंदराव वाघमारे यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. मुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवार होत्या. त्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद