शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:32 IST

जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम

ठळक मुद्देबागडे सहाव्यांदा, भुमरे पाचव्यांदा शिरसाट, बंब यांनी साधली विजयाची हॅट्ट्रिकबोरनारे, राजपूत करणार प्रथमच विधानसभेत प्रवेश

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. यात ६ जागांवर शिवसेना, तर ३ जागांवर भाजपने यश मिळविले आहे. औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेने एमआयएमकडून खेचून घेतला आहे.  

औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात थेट लढत झाली. यात सावे यांनी ९३,९६६ मते घेत कादरी यांचा १३ हजार ९३० मतांनी पराभव केला. औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट, अपक्ष राजू शिंदे आणि एमआयएमचे अमित भुईगळ यांच्यात लढत झाली. यात शिरसाट यांनी एकूण ८३,७९२ मते घेत बाजी मारली. मध्यमध्ये यावेळी सेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी ८२ हजार २१७ मते घेत ही जागा एमआयएमकडून खेचून आणली. गंगापूरमध्ये हॅट्ट्रिक साधत भाजपचे प्रशांत बंब यांनी ३४,९७१ मतांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांचा पराभव केला.

ग्रामीणमधील निकालाचे चित्र असेअब्दुल सत्तार यांची सरशीसिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २३ हजार ३८३ मते घेतली आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा २४ हजार ३८१ मतांनी पराभव केला, तर फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा १५,२७४ मतांनी पराभव केला. बागडे यांनी आठ वेळा निवडणूक लढविली असून, पैकी ते सहाव्यांदा निवडून आले.

ग्रामीणमध्येही भगवाचपैठणमध्ये संदीपान भुमरे यांनी १४ हजार १३९ मताधिक्याने पाचव्यांदा विजय मिळविला असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांचा पराभव केला आहे. वैजापूरमध्ये सेनेचे रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर यांचा तब्बल ५८ हजार ८१८ मतांनी पराभव केला. कन्नडमध्ये सेनेचे उदयसिंह राजपूत यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमphulambri-acफुलंब्रीsillod-acसिल्लोडkannad-acकन्नडvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरpaithan-acपैठणAurangabadऔरंगाबाद