शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:32 IST

जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम

ठळक मुद्देबागडे सहाव्यांदा, भुमरे पाचव्यांदा शिरसाट, बंब यांनी साधली विजयाची हॅट्ट्रिकबोरनारे, राजपूत करणार प्रथमच विधानसभेत प्रवेश

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. यात ६ जागांवर शिवसेना, तर ३ जागांवर भाजपने यश मिळविले आहे. औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेने एमआयएमकडून खेचून घेतला आहे.  

औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात थेट लढत झाली. यात सावे यांनी ९३,९६६ मते घेत कादरी यांचा १३ हजार ९३० मतांनी पराभव केला. औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट, अपक्ष राजू शिंदे आणि एमआयएमचे अमित भुईगळ यांच्यात लढत झाली. यात शिरसाट यांनी एकूण ८३,७९२ मते घेत बाजी मारली. मध्यमध्ये यावेळी सेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी ८२ हजार २१७ मते घेत ही जागा एमआयएमकडून खेचून आणली. गंगापूरमध्ये हॅट्ट्रिक साधत भाजपचे प्रशांत बंब यांनी ३४,९७१ मतांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांचा पराभव केला.

ग्रामीणमधील निकालाचे चित्र असेअब्दुल सत्तार यांची सरशीसिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २३ हजार ३८३ मते घेतली आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा २४ हजार ३८१ मतांनी पराभव केला, तर फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा १५,२७४ मतांनी पराभव केला. बागडे यांनी आठ वेळा निवडणूक लढविली असून, पैकी ते सहाव्यांदा निवडून आले.

ग्रामीणमध्येही भगवाचपैठणमध्ये संदीपान भुमरे यांनी १४ हजार १३९ मताधिक्याने पाचव्यांदा विजय मिळविला असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांचा पराभव केला आहे. वैजापूरमध्ये सेनेचे रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर यांचा तब्बल ५८ हजार ८१८ मतांनी पराभव केला. कन्नडमध्ये सेनेचे उदयसिंह राजपूत यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमphulambri-acफुलंब्रीsillod-acसिल्लोडkannad-acकन्नडvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरpaithan-acपैठणAurangabadऔरंगाबाद