शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

इथं जेवायला दोन वेळेसचं नाही आणि यांचं मात्र योगा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:57 PM

इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला.

औरंगाबाद : इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला.जालना रोडवरील सागर लॉनवर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस बुथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करीत होते. मेळाव्यास विशेषत: ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर येथे होणारे पावसाळी अधिवेशन आम्ही शेतकºयांच्या प्रश्नांसाठी बंद पाडू, असा स्पष्ट इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला. ‘यांचा’ काय पायगुण चांगला नाही. मनुवादाला खतपाणी घालणारी ही मंडळी. आता आपला वैचारिक दुश्मन आरएसएस तर कॅन्सरप्रमाणे गावागावांत पसरत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा वेळी अधिक गंभीर होऊन बुथ कमिट्या स्थापन करण्याचे काम पूर्ण केले पाहिजे. आरएसएस, भाजप व शिवसेनेशी आपला मुकाबला आहे व समविचारी पक्षांशी दोस्ती करून देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी जिल्ह्यातील मतदारसंघवार आढावा घेतला. तय्यब पटेल (पैठण), भाऊसाहेब जगताप (औरंगाबाद पूर्व), नामदेवराव पवार (औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम), गोकुळसिंग राजपूत व बाबासाहेब मोहिते (कन्नड), पंकज ठोंबरे (वैजापूर), भरत तुपलोंढे (गंगापूर), भगवान मुळे (फुुलंब्री), संजय मोरे (खुलताबाद), रामदास पालोदकर (सिल्लोड) व आबा काळे (सोयगाव) यांनी आपला अहवाल सर्वांसमोर ठेवला. ‘कुणी खरं काम केलंय व कुणी बंडला मारल्या आहेत’ हे माझ्या लक्षात आलंय. फुलंब्रीचं काम उत्कृष्ट झालं आहे’ असा शेरा चव्हाण यांनी मारला.बघता काय मोर्चे काढा!खा.चव्हाण यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात शेतकºयांची अवस्था वाईट आहे. १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जमाफी कुठेच झालेली नाही. पण सरकार त्यांच्याकडे बघायला तयार नाही. हरभरा, तूर खरेदी नाही. पीक विमा कुठेच मिळालेला नाही. शेतकºयांना नवीन कर्जेही मिळत नाहीत. पाकिस्तानातून दाऊदला तर आणले नाहीच. पण तिथली साखर मात्र आणली. ही सारी परिस्थिती बघत बसू नका. शेतकºयांना कर्जे न देणाºया त्या- त्या बँकांंवर मोर्चे काढा, असा आदेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण