शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

२०१६ मध्ये झाले नुकसान; २०१८ मध्ये दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 2:12 PM

दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी अनुदान जाहीर केले.

ठळक मुद्दे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी राज्यभरासाठी ५१५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीचा लाभ दोन वर्षांनी देण्याचे जाहीर होत असल्यामुळे शासन किती गतिमानतेने काम करीत आहे, याचा प्रत्यय येत आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना ही मदत मिळणार आहे. ही रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात  येणार असून त्यातून बँकेने खातेदारांच्या खात्यातून कोणतीही थकबाकी वसूल करू नये, अशा सूचना शासनाने विभागीय आयुक्तांना केल्या आहेत. 

औरंगाबादला फक्त ५१ लाखऔरंगाबाद जिल्ह्यातील २४८८ शेतकऱ्यांना ५१ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सुमारे साडेतीन हजार रुपये प्रती हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यावर जाणे अपेक्षित आहे. पीक विमा नुकसानभरपाईच्या ५० टक्क्यांप्रमाणे ही मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १६ व १७ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले होते. दोन वर्षांनंतर शासनाने तुटपुंजी का होईना शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. 

मराठवाड्याला दिले ४९ कोटीमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी शासनाने ४९ कोटी रुपये दिले आहेत. २१ लाख ५० हजार २८४ शेतकऱ्यांना ती मदत मिळणार आहे. यामध्ये औरंगाबादला ५१ लाख, परभणी ५० लाख, हिंगोली सव्वाकोटी, नांदेड २६ कोटी, बीड ६ कोटी तर लातूरला ५ कोटी, उस्मानाबादला ११ कोटी असे सुमारे ४९ कोटींच्या आसपासची रक्कम विभागाला मिळणार आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारfundsनिधीFarmerशेतकरी