शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

परतीच्या पावसाने मराठवाड्यातील ३० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:33 IST

७० टक्क्यांवर शेतीला ओल्या दुष्काळाचा फटका

ठळक मुद्दे८ हजार ४५० गावे बाधित  ३ ते ४ दिवसांत पंचनामे पूर्ण करा 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ३० लाख हेक्टरवरील पिकांचे आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिला. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाड्यात परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीचा आढावा प्रशासनाकडून घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हानिहाय पिकांच्या नुकसानीची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  शासनाला दिली. 

प्राथमिक अहवालानुसार विभागात एकूण ५२ लाख ६५ हजार १६५.९६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यातील ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विभागातील ८ हजार ५१४ पैकी ८,४५० गावांना आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. ४३ लाख १ हजार ४३६ पैकी ३० लाख २५ हजार ७६२ शेतकरी बाधित झाले आहेत. जिरायती आणि बागायती मिळून सुमारे २९ लाख ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे. सोयाबीनचे १२ लाख २८ हजार ९४० हेक्टर, कापसाचे ११ लाख ४४ हजार ५२९ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. इतर खरीप हंगामातील ५ लाख ८४ हजार १३१ हेक्टवरील पिके वाया गेली आहेत. ७० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक टक्केवारी समोर आली आहे. 

मराठवाड्यात दोन तालुक्यांत कोरडा दुष्काळमराठवाड्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात दुष्काळ असल्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. अंबाजोगाईत गंभीर तर परांडा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला असताना त्या तालुक्याचा समावेश दुष्काळात केला गेला नाही.

३ ते ४ दिवसांत पंचनामे पूर्ण करा ऑक्टोबर महिन्यात विभागात ३३७ टक्के पाऊस सरासरीच्या अधिक झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळाने तर यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार बाजरी ९० टक्के, मका ९० टक्के , सोयाबीन ८० टक्के तर कापसाचे ७५ टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला आहे. 

जिल्हा     बाधित गावे       नुकसान टक्केवारीउस्मानाबाद    ७३२    ४१.४३%नांदेड    १,४८८    ५४.२५%औरंगाबाद    १,३५५    ५९.०५%परभणी    ८४३    ५९.३९%हिंगोली    ७०७    ६०.९३%लातूर    ९५१    ६२.२०%बीड    १,४०२    ७३.३२%जालना    ९७२    ७०.४०%एकूण    ८,४५०    ७० %च्या आसपास 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी