शेतकऱ्यांच्या यशोगाथातून ‘लोकमत’ने केला प्रबोधनाचा जागर

By Admin | Updated: December 12, 2014 00:53 IST2014-12-12T00:46:23+5:302014-12-12T00:53:49+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या महिनाभरात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे नवनवीन प्रयोग करून

'Lokmat' from the success of the farmers' awareness, awakened awareness | शेतकऱ्यांच्या यशोगाथातून ‘लोकमत’ने केला प्रबोधनाचा जागर

शेतकऱ्यांच्या यशोगाथातून ‘लोकमत’ने केला प्रबोधनाचा जागर


लातूर : लातूर जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या महिनाभरात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे नवनवीन प्रयोग करून संकटावर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ‘लोकमत’ने वाचकांसमोर आणल्या. ‘आता रडायचं नाही, लढायचं...’ हा संदेश शेतकऱ्यांना गुरुवारच्या ‘हॅलो लातूर’मधून दिला. या उपक्रमाचे कौतुक वाचकांसह शेतकऱ्यांनी केले असून, गुरुवारी दिवसभर ‘लोकमत’ कार्यालयातील दूरध्वनी खणखणत होता. ‘लोकमत’वर एकप्रकारे वाचकांनी कौतुकांचा वर्षावच केला.
लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी संकटांवर मात करून आपल्या शेतशिवारात प्रयोग केले आहेत. तुटपुंज्या पाण्यावर अनेक पिके घेऊन आपल्या संसारवेलीला फुलविले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्येचा विचार सोडून पुन्हा शेतीत मन रमवून प्रयोग केले. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा शोध घेऊन ‘लोकमत’ने त्यांच्या यशोगाथा वाचकांसमोर आणल्या. यामुळे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे म्हणाले, कर्जबाजारीपणाला आत्महत्या हा काही उपाय नाही. त्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. ‘लोकमत’ने ‘हॅलो लातूर’च्या चारही पानांत प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा देऊन प्रबोधनाचा जागरच केला आहे. प्रशासन म्हणून आम्ही हे करण्यास कमी पडलो. पण ‘लोकमत’ने लोकांची नाडी ओळखून प्रबोधन केले आहे, हे खरोखरच कौतुकास पात्र असल्याचे ते म्हणाले.
वर्तमानपत्र चाळताना कोठे ना कोठे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी दररोज वाचायला मिळते. परंतु, गुरुवारच्या अंकात ‘शेतकऱ्यांच्या यशोगाथा’ वाचायला मिळाल्या. रडत बसणारे शेतकरी नाहीत, हेही समजले. ‘लोकमत’चे खरोखरच कौतुक करायला हवे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एस. मोटे म्हणाले.
शासनाने आता दुष्काळावर पॅकेज जाहीर केले आहे. उपाययोजना होतील, परंतु सारखेच नकारात्मक वाचायला आवडत नाही. परंतु, माध्यमात आम्हाला ते वाचावे लागते. याला बगल देत शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करू नये. स्वत:चा विकास स्वत: करावा, असा संदेश यशोगाथेतून ‘लोकमत’ने घरोघरी पोहोचविला, अशी भावना भाजपाचे जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)४
पाऊसकाळ कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या मदतीवर जगणे आवडत नाही. म्हणून तर तो गळफास घेतोय. परंतु, हा पर्याय नाही. हा संदेश ‘लोकमत’ने यशोगाथेतून दिला, तो कौतुकास्पद आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. गोविंद सिरसाट यांनी दूरध्वनीकरून सांगितले.

Web Title: 'Lokmat' from the success of the farmers' awareness, awakened awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.