शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 8:32 PM

हर्षवर्धन जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

- नजीर शेख  

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी आता काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव समोर आल्याने आणि वंचित आघाडीतर्फे एमआयएमचा उमेदवार मैदानात असेल, या घोषणेमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चांगलाच रंग भरण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मराठवाडास्तरीय मेळाव्याने युतीच्या प्रचाराची सुरुवात झाली. युतीतर्फे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. आ. सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसतर्फे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. 

काँग्रेस पक्षाने केंद्रीय समितीकडे पाठविलेल्या नावांमध्येदेखील सुभाष झांबड यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत काँग्रेसने राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांना अचंबित करून टाकले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी तिसरे नाव कन्नडचे शिवसेना बंडखोर आमदार हर्षवर्धन पाटील यांचे असल्याचे सांगून आणखी मोठा धक्का दिला. आता जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

एमआयएममुळे कॉंग्रेसची अडचण

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे हे राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत. युती झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु असतानाच एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करून काँग्रेसची अडचण केली आहे. या मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम मतांची संख्या पाहता युती आणि काँग्रेस आघाडी या दोन्हींच्या संघर्षात वंचित आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, अशी त्यांची अटकळ आहे. एमआयएमकडून औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांचे नाव सर्वात पुढे आहे. काँग्रेसकडून नावे चर्चेत आहेत. मात्र, कोणता उमेदवार असेल हे निश्चित मानले जाऊ शकत नाही. 

काँग्रेससमोर मोठे आव्हाननगरसेवकपदापासून खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करेपर्यंत पराभव न पाहणारे, तसेच अंतुले यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता असणाऱ्या खैरे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देणे हे काँग्रेसमोरील मोठे आव्हान आहे. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये खैरे निवडून आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच अधिक चर्चा होत असते. यावेळीही ही चर्चा चालूच आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस