शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : युतीच्या मतदारांची ‘सहल’ इगतपुरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:42 IST

आघाडीची जादुई आकड्यासाठी जुळवाजुळव

ठळक मुद्देमतदारांना एकत्रितपणे नेण्याऐवजी त्यांची वेगवेगळी व्यवस्थाएक अपक्ष उमेदवारही मैदानात आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. १५ ऑगस्टपासून मतदानाच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाआघाडीचे मतदार अज्ञातस्थळी रवाना होणार आहेत. महायुतीचे अज्ञातस्थळ इगतपुरी असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून बाहेर आली आहे. 

इगतपुरीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीचे सुमारे ३३० हून अधिक मतदार पाच दिवस यथेच्छ आनंद लुटतील. त्यानंतर त्यांना फे्रश मूडमध्ये औरंगाबादला आणले जाईल. तेथून आल्यावर मतदारांना थेट गटनिहाय मतदान केंद्रांवर नेले जाईल. त्यांचे मतदान करून घेतल्यानंतर त्यांची राजकीय नजरकैदेतून सुटका होईल. १५ ऑगस्टपासून १८ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत हे सर्व मतदार पक्षातील वरिष्ठांच्या देखरेखीत असतील. त्यांना इतर राजकीय पक्षांतील लोकांशी बोलता येणार नाही. तसेच त्यांचा संपर्कदेखील होणार नाही. तहसीलनिहाय मतदान होणार असल्यामुळे प्रत्येक केंद्रनिहाय मतदारांचे गट करण्यात आले आहेत. १७ मतदान केंद्रांवर जाणाऱ्या मतदारांना एकत्रितपणे नेण्याऐवजी त्यांची वेगवेगळी व्यवस्था केली जाणार आहे.

महायुतीकडून अंबादास दानवे तर महाआघाडीकडून भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे उमेदवार आहेत. एक अपक्ष उमेदवारही मैदानात आहे. पहिल्या पसंतीचे बहुमत सध्या महायुतीच्या बाजूने दिसते आहे. फोडाफोडी आणि घोडेबाजाराचे राजकारण सध्या तरी चर्चेत नाही. भाजपला शांत करण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे आणि कुलकर्णी यांच्यात कोण बाजी मारील याचा निकाल २२ आॅगस्ट रोजी हाती येणार आहे. दरम्यान शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, महायुतीने पूर्ण तयारी केली असून, विजयाच्या दिशेने आम्ही जाऊ. १८ आॅगस्टपर्यंत मतदारांसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाआघाडीचे उमेदवार कुलकर्णी म्हणाले, आमचे मतदार सोबतच आहेत. आमचीही तयारी पूर्ण झाली आहे.

राजकीय समीकरण महायुती    ३३०महाआघाडी    २५०एमआयएम-अपक्ष    ०७७एकूण    ६५७

अंदाजे पक्षीय बलाबल पक्ष    मतदार भाजप    १८९शिवसेना    १४१    काँग्रेस    १७०राष्ट्रवादी काँग्रेस    ०८०एमआयएम    ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष    ०४९एकूण    ६५७

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबादJalanaजालनाBJPभाजपाShiv Senaशिवसेना