शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेकडून रिकाम्या हंड्याची पालखीत मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:52 IST

आंदोलकांनी लबाड भाजप सरकारने पाणी वेळेवर दिले नाही, असा आरोप करून "लबाडांनो, पाणी द्या" अशी जोरदार घोषणाबाजी केली.

छत्रपती संभाजीनगर : पाण्यासाठी ठाकरेसेनेने आज शहरात 'पालखी दिंडी व अभंग आंदोलन' उभारले. यावेळी पालखीत रिकामा हंडा ठेवण्यात आला होता. एन-६ वसाहतीतील आविष्कार चौक ते चिश्तिया चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या अनोख्या दिंडीत महिलांनी रिकाम्या हंड्यांसह नृत्य करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला. 

यावेळी ठाकरे शिवसेना नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वारकरी वेशात टाळमृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनात बोलताना सांगितले, "आज छत्रपती संभाजीनगरकरांना विठ्ठलाप्रमाणे पाण्याची आस लागली आहे. भक्ताला विठ्ठल हवा तसंच नागरिकांना पाणी हवे आहे." असे म्हणत दानवे यांनी प्रशासनावर निशाणा साधला. महिलांनी विडंबनात्मक अभंग गात प्रशासनाला चिमटे काढले. हातात टाळ, मुखावर आक्रोश आणि कमरेवर रिकामे हंडे घेऊन त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले, "२०२२ मध्ये पाणी देण्याची ग्वाही देणारे सत्ताधारी लबाड ठरले आहेत. तीन वर्षांतही पाणी मिळाले नाही. त्यामुळे 'लबाडांनो, पाणी द्या' हे जनआंदोलन सुरूच राहणार आहे."

या आंदोलनात आदर्श महिला भजनी मंडळ, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ यांच्यासह अनेक भजनी मंडळे सहभागी झाली. पेटीवादक केशव मुळे, मृदंगाचार्य अशोक जैन यांच्यासह वारकरी कलाकारांनी देखील या दिंडीत हजेरी लावली. ठाकरे शिवसेनेचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवतीसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाणी देण्याची केली मागणी"लबाडांनो, पाणी द्या" हे ठाकरे शिवसेनेचे जनआंदोलन पुढील महिनाभर सुरू राहणार आहे. शहरातील प्रत्येक वार्डमध्ये पाण्याची समस्या आहे. वेळेवर आणि मुबलक पाणी मिळत नसल्याने शहरासाठी योग्य पाणी नियोजन करण्याची मागणी ठाकरेसेनेकडून करण्यात आली आहे. आंदोलकांनी लबाड भाजप सरकारने पाणी वेळेवर दिले नाही, असा आरोप करून जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv SenaशिवसेनाWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका