शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 19:22 IST

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे.

औरंगाबाद : जायकवाडीचे ( Jayakwadi Dam ) दोन्ही कालवे दुरस्त करण्यासाठी ३ हजार कोटींपर्यंत खर्च आला तरी चालेल. जागतिक बँकेकडून कर्ज घेऊ, परंतु दोन्ही कालवे आधुनिक पध्दतीने बांधू, असा विश्वास व्यक्त करीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी पाणीपट्टीचे प्रमाण वाढविण्याच्या आणि पाणीवाटपात पारदर्शकपणा आणण्याच्या सूचना रविवारी संबंधित यंत्रणेला केल्या. ते एमजीएम येथील कार्यक्रमात बोलत होते.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे. अनेक ठिकाणची पाणी वितरण परिस्थिती वाईट झालेली आहे. जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करणे, आहे ती गळती बंद करणे, त्याला आधुनिक स्वरूप देणे, पाणी वाटप पारदर्शक करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. दोन्ही कालव्यांचे सर्वेक्षण करून आधुनिक पद्धतीने हे काम होणार आहे. परंतु वापरलेल्या पाण्याची पट्टी येणेदेखील गरजेचे आहे. फक्त १६ टक्के पाणीपट्टी वसुली होत आहे. जायकवाडी धरण निम्म्यावर येते, तरी वसुली होत नाही. पाणीवाटप कार्यक्षमतेने होते, तसेच वसुलीदेखील व्हावी. कालवे दुरुस्त होईपर्यंत पाणी वाटपात पारदर्शीपणा आणावा लागेल.

‘ब्रम्हगव्हाण’ ला मान्यता देणारदोन आठवड्यात मंत्रिमंडळासमोर जाईल. सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव जाणे गरजेचे आहे. असे पाटील म्हणाले. १ हजार कोटींची सुधारीत मान्यता ब्रम्हगव्हाणसाठी असणार आहे. असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

५० टक्क्यांपेक्षा कमी सिंचनजायकवाडीच्या कालव्यांना गळती लागल्यामुळे ५० टक्के पाणी सिंचनाला मिळते आहे. ३२०० क्युसेसची कालव्यांची क्षमता आहे. १२०० क्युसेस पाणीदेखील त्यातून शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही. दरवर्षी १०० ते ५० कोटी डागडुजीला देऊन वेळ मारून नेली जाते. असे करीत राहिलो तर ५० वर्षांतही कालवे दुरुस्त होणार नाही, असे आ. सतीश चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणJayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबाद