शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’

By विकास राऊत | Updated: May 16, 2023 12:09 IST

सरकार, प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात १ जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांत ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कमी शेती, शाश्वत सिंचनाचा अभाव, लहरी निसर्गामुळे गुुंतवणूक व श्रमाच्या तुलनेत शेतीतून उत्पन्न मिळत नसल्यामुळे दिवसेंदिवस होत जाणारे हलाखीचे जगणे, त्यातच सरकारी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पाच ते दहा टक्क्यांनी सावकारी कर्जाच्या फासात अडकल्यानेच नाईलाजाने काही शेतकरी मरणाला जवळ करत आहेत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी बळिराजा सर्व्हे सुरू केला आहे. यानिमित्त सोमवारी जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा जगण्याचा संघर्ष उलगडला. फर्दापूरच्या मीना दिलीप अंबूरे, खुलताबादचे गणेश गायकवाड, फुलंब्रीचे गणेश गव्हाणे, बाजारसावंगीतील सय्यद लाल या शेतकऱ्यांनी त्यांचे जगणे म्हणजे काय, याचा पट उभा केला. बोगस बियाणे, सावकारी कर्ज, सरकारी बँकांकडून होणारी हेळसांड, नैसर्गिक आपत्ती, उत्पन्नाची हमी नसणे, कुटुंबांची जबाबदारी, जोडधंदा नसल्यामुळे शेती आतबट्ट्याचा खेळ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सरकार, प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे. गेल्यावर्षी १ हजार २२ आत्महत्या झाल्या. त्यात सर्वाधिक २७० आत्महत्या या बीड जिल्ह्यातील होत्या. यंदाही बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या पाच जिल्ह्यांत चार महिन्यांत १८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धाराशिव, परभणी जिल्ह्यांत ८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३५ आत्महत्या झाल्या आहेत.

मनात आत्महत्येचा विचार येतो....सरकारी कर्ज मोठे, चार एकर शेतीतील उत्पन्नातून कर्जफेड होत नाही. पती अपंग, मुलांची जबाबदारी आहे. ५ ते १० टक्के व्याजाने सावकारी कर्ज घेऊन सरकारी कर्ज फेडावे लागते आहे.-मीना दिलीप अंबूरे, शेतकरी फर्दापूर

रोज नैराश्याशी गाठ....शेतीतून उत्पन्न मिळत नाही. मी उच्चशिक्षित असून नोकरी नसल्याने आई-वडिलांसोबत शेती करतो. २ लाखांचे कर्ज असून सावकारी कर्जाविना पर्याय नाही. रोज नैराश्याशी गाठ पडते.-गणेश गायकवाड, शेतकरी खुलताबाद

अनेक अडचणी आहेत....नैराश्याने कुटुंब ग्रासले आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी आहेत. चार एकर शेती आहे, परंतु तलावालगत असल्याने दरवर्षी वाहून जाते. उत्पन्न मिळत नसल्यामुळे कर्जाविना जगता येत नाही.-ज्ञानेश्वर गव्हाणे, शेतकरी फुलंब्री

जिल्हा             चार महिन्यांतील शेतकरी आत्महत्यांची संख्याऔरंगाबाद........ ३५जालना............२२परभणी...........२६हिंगोली............११नांदेड.............४७बीड .............८१लातूर...........२३धारशिव.......६०

हा आत्महत्यांचा वाढता आलेखवर्ष शेतकरी आत्महत्येचा आकडा....२०२०..........७७३२०२१..........८८७२०२२.......... १,०२२२०२३ (३० एप्रिलपर्यंत) ३०५

 

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद