शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम पैसेवारी ४४ पैसे

By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३५६ गावांतील रबी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती ४४ पैसे इतकी आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३५६ गावांतील रबी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती ४४ पैसे इतकी आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पावसाअभावी पेरणीस झालेला उशिर तर काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने रबीच्याउत्पादनामध्ये घट झाली आहे. यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे रबीच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अत्यल्प पावसामुळे स्त्रोतांच्या पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. परिणामी पाण्याअभावी रबीची पिकेही करपून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात ७३७ महसुली गावे आहेत. त्यापैकी खरीप पेरणी पिकाखालील ३६२ तर रबीच्या पिकाखाली पावणेचारशे गावे आहेत. कळंब तालुक्यातील १९ गावांची रबी पेरणी गावात खरीप पिकांचा पेरा २/३ पेक्षा जास्त असल्यामुळे पैसेवारी जाहीर करण्यात आली होती.दरम्यान, उर्वरित ३५६ गावांतील रबी पिकांची अंतिम पैसेवारी काढण्यात आलेली आहे.यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ६९, तुळजापूर ४७, , भूम ९०, लोहारा १०, वाशी २३ आणि परंडा तालुक्यातील ९६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल तहसीलदारांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी सात तालुक्यांतील ३५६ गावांची रबी पिकांची पैसेवारी ४४ पैसे इतकी जाहीर केली आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रबी पेरणीची ३७५ गावे असून त्यापैकी कळंब तालुक्यातील १९ गावातील रबी पेरा २/३ पेक्षा जास्त पेरणी खरीप हंगामात झालेली असल्यामुळे त्या गावाची पैसेवारी खरीप हंगामात जाहीर केली असल्याने, सदर गावाची रबी हंगामाची पैसेवारी निरंक आहे. (प्रतिनिधी)