शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:40 IST

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याची शेवटची संधी म्हणून औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ...

ठळक मुद्देखंडपीठ : सहा आठवड्यांत अहवाल सादर न केल्यास महसूल विभागाच्या सचिवांसह प्रतिवादींना प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याची शेवटची संधी म्हणून औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहा आठवड्यांचा वेळ दिला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी शपथपत्र दाखल करण्याचे आदेशात म्हटले आहे.सहा आठवड्यांत वरीलप्रमाणे अहवाल सादर न केल्यास महसूल विभागाच्या सचिवांसह औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसेच जालन्याचे जिल्हाधिकारी यांनी याचिकेच्या पुढील सुनावणीच्या वेळी खंडपीठात हजर राहावे, असेही आदेशात म्हटले आहे. याचिकेची पुढील सुनावणी ७ जून २०१९ रोजी होणार आहे.स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांनी कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला ३ सप्टेंबर २०१४ चा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी २५ फेब्रुवारी रोजी रद्द केला होता. तसेच आदेश निघाल्यापासून (दि.२५ फेब्रुवारी २०१९) एक महिन्यात संबंधित बोगस पाल्यांविरुद्ध पुढील योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाºयांना दिला होता.याचिका २२ एप्रिल रोजी पुन्हा सुनावणीस निघाली असता जालन्याच्या निवासी उपजिल्हाधिकाºयांनी सार्वत्रिक निवडणुकीचे कारण दर्शवून वरीलप्रमाणे अहवाल सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली होती. तसेच प्रतिवादींच्या वतीने सहायक सरकारी वकिलांनीसुद्धा वेळ देण्याची विनंती केली असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.स्वातंत्र्यसैनिकांच्या वरील पाल्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास मनाई करणारा माजी मुख्यमंत्र्यांनी कक्ष अधिकाºयांमार्फत दिलेला ३ सप्टेंबर २०१४ चा आदेश रद्द करावा आणि बोगस पाल्यांना बडतर्फ करावे, अशी विनंती करणारी याचिका पांडुरंग निवृत्ती मोने यांनी अ‍ॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली होती.----------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय