शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

औरंगाबादमधून पळविलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी उधळली मुंबईतील बारबालांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:50 IST

बारबाला असलेल्या मैत्रिणीच्या खात्यात मोठी रक्कम केली जमा

ठळक मुद्देदोन दिवस वाढली कोठडी खोटे ओळखपत्र दाखवून थांबले होते हॉटेलमध्ये

औरंगाबाद : पैशाची बॅग पळविल्याप्रकरणी कोल्हापुरातून पकडून आणलेल्या तीनपैकी दोघांनी बारबालांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. एवढेच नव्हे, तर औरंगाबादेत लुटलेल्या लाखो रुपयांमधील मोठी रक्कम बारबाला असलेल्या मैत्रिणीच्या खात्यात जमा केल्याचे आढळून आले.

हर्सूल येथील प्रल्हाद विठ्ठल मोरे यांच्या हातातील तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कोल्हापूर येथून विष्णूसिंह ऊर्फ विशालसिंह प्रमोदसिंह (घोडबंदर, ठाणे, मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश), सोनूसिंह  उमाशंकर सिंह (रा. राजगड, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) आणि संदीप सत्तू सोनकर (रा. सोनपत, उत्तर प्रदेश) यांना ७ जुलै रोजी पकडून आणले होते. तेव्हापासून आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आरोपींनी बहुतेक पैसे मुंबईतील लेडिज डान्सबारमध्ये  मुलींवर उधळल्याचे सांगितले. 

पोलीस कोठडी दोन दिवसआरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि. १०) संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. आरोपींनी आग्रा येथील एका महिलेच्या खात्यात रक्कम जमा केली होती. ही रक्कम जप्त करून आणण्यासाठी आरोपींना आग्रा येथे घेऊन जाणे असल्याने त्यांना ७ दिवस कोठडी देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMONEYपैसाAurangabadऔरंगाबाद