शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुलकर्णी म्हणाले, ‘मी मायक्रो मायनॉरिटी’; अंबादास दानवे म्हणाले, ‘मला आशीर्वाद द्या...!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:50 IST

काँग्रेस आघाडीचे कुलकर्णी आणि महायुतीचे दानवे झाले आमने-सामने

ठळक मुद्दे७ उमेदवारांचे १२ अर्जमतदार झाले ६५७

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी आमने-सामने झाले. 

दानवे यांनी कुलकर्णी यांच्या पायाला वाकून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करताच कुलकर्णी म्हणाले, दानवे मी मायक्रो मायनॉरिटी आहे.  या म्हाताऱ्याला जाऊ द्या. त्यावर दानवे यांनी मला आशीर्वाद असू द्या, म्हणत कुलकर्णी यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांचे आशीर्वाद घेतले. कुलकर्णी यांनी चमत्कार करून दाखवील, माझे गणित एकदम चांगले आहे, असा दावा केला तर दानवे यांनीदेखील आशीर्वादावर विजय होण्याचा संकल्प केला. कुलकर्णी आणि दानवे यांच्यातील खेळीमेळीचा संवाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात जोरदार हंशा पिकवून गेला. 

महायुती आणि आघाडीचे उमेदवार आमने-सामने झाल्यानंतर या कलगीतुऱ्याने काही क्षणासाठी निवडणुकीचे वातावरण असल्याचे विसरण्यास भाग पाडले. महायुतीकडून दानवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खा. चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले आदींची यावेळी उपस्थिती होती. कुलकर्णी यांचा अर्ज दाखल करताना आ.सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदींची उपस्थिती होती. कुलकर्णी यांनी अर्ज २ दिवसांपूर्वीच दाखल केला होता. गुरुवारी  बी-फॉर्म त्यांनी सादर केला. 

७ उमेदवारांचे १२ अर्जया निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महायुतीकडून अंबादास दानवे यांचे ४ अर्ज, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी यांचे २, अपक्ष विशाल नांदरकर १, नंदकिशोर सहारे यांचे २, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख १, तात्यासाहेब चिमणे १, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांचा १, असे १२ अर्ज सहायक निवडणूक अधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे दाखल करण्यात आले. २ आॅगस्ट रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १० हजार रुपये अनामत रक्कम होती.

मतदार  झाले ६५७औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील फुलंब्रीतील एका सदस्याचे पद रद्द केल्यामुळे ६५६ मतदार होते. सदरील सदस्य कोर्टात गेल्यामुळे त्याचे पद वैध ठरल्याने आता पुन्हा ६५७ मतदारसंख्या झाली आहे. ३८५ औरंगाबाद जिल्ह्यात तर २७२ जालना जिल्ह्यातील मतदार आहेत.

दानवे साहेब... या म्हाताऱ्याला पुढे जाऊ द्या, असे म्हणत आघाडीचे उमेदवार कुलकर्णी यांनी महायुतीचे उमेदवार दानवे यांची गळाभेट घेतली, तर आशीर्वाद घेण्यासाठी दानवे हे कुलकर्णीच्या पायाला वाकले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAurangabadऔरंगाबादJalanaजालना