शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

औरंगाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:56 IST

औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधाºयांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या बहुतांशी बंधारे कोरडेठाक आहेत.

औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधा-यांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या बहुतांशी बंधारे कोरडेठाक आहेत.

यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, जि. प. जलसंधारण समितीने १ कोटी ७५ लाख रुपयांचा गेट खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर उपविभागनिहाय गेट खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात जि. प. उपकरातून पावणेदोन कोटी रुपयांची गेट खरेदीसाठी तरतूद करण्यात आली. त्यानुसार जलसंधारण समितीने सदरील प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ई- निविदा प्रक्रियेस मान्यता मिळाली. पावणेदोन कोटी रुपयांतून १ हजार ८०० गेट खरेदी केले जाणार आहेत. उपकरातून रबरी सील खरेदीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावालाही जलसंधारण समितीने मान्यता दिली असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मागील तीन वर्षांपासून गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेत आहे. पूर्वी जि. प. अर्थसंकल्पात उपकरातील २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची गेट खरेदीसाठी तरतूद करण्यात आली होती. दोन-अडीच वर्षांपासून सातत्याने निविदा काढण्यात आल्या; पण पुरवठादार संस्थांकडून निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या वर्षी एक पुरवठादार संस्था तयार झाली.

मात्र, विद्यमान सदस्य मंडळाने सर्वसाधारण सभेत गेट खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तरतूद असतानाही प्रशासनाला गेट खरेदी करता आले नाहीत. केवळ गेटअभावी कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवता येत नव्हते. यंदा पाऊस कमी झाला व त्यात पावसाचा मोठा खंडही पडला. त्यामुळे जिल्ह्यातील बंधा-यांमध्ये पाणी साचू शकले नाही. आता खरेदी करण्यात येणाºया गेटचा यंदा फायदा होणार नसला, तरी पुढील काळात याचा फायदा नक्कीच होईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे म्हणाले.३५७ बंधा-यांना गेट बसविलेजिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. यापैकी ३५७ बंधाºयांना पुरेसे गेट आहेत. उर्वरित २२८ बंधा-यांपैकी काहींना कमी गेट आहेत, तर काहींना गेटच नाहीत. यासाठी ७ हजार ५०० गेटची आवश्यकता आहे. उपकरातील निधीतून यंदा १ हजार ८०० गेट खरेदी केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३८ बंधाºयांना १५५६ गेट बसविले जाणार आहेत. जि. प. उपकर व जलयुक्त शिवार योजनेतून या वर्षात सुमारे साडेतीन हजार गेट बसविले जातील.

 

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबाद