शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

विद्यापीठात निर्मळ, स्वच्छ वातावरण निर्माण झाले तरच ज्ञानात्मक प्रगती: सुधीर रसाळ 

By योगेश पायघन | Updated: August 23, 2022 18:32 IST

विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनी डॉ. सुधीर रसाळ जीवन साधना पुरस्काराने सन्मान

औरंगाबाद -विद्यापीठात विभागांनी ज्या प्रकारचे काम करायला हवे ते केले नाही. विभागप्रमुख, प्राध्यापकांत राजकारण, संशोधनात बाधा आणण्याचे कितीतरी प्रकार मी स्वतः अनुभवलेले आहे. विद्यापीठात निर्मळ स्वच्छ वातावरण निर्माण झाले. तरच ज्ञानात्मक प्रगती होवू शकते. प्राध्यापक हे उत्तम दर्जाचे संशोधक हवे. कुलगुरूंना वैयक्तिक संशोधनला स्थान, सवडीची व्यवस्था निर्माण झाल्यास विद्यापीठ आहे त्या पेक्षा अधिक चांगले संशोधन कार्य करू शकेल असे ज्येष्ठ समिक्षक डाॅ. सुधीर रसाळ म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवन साधना पुरस्कार साहित्यिक ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते गाैरवण्यात आले. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. विद्यापीठ स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा देत त्यावेळी असलेल्या घरघुती वातावरणाची आठवण करून देत पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. शिक्षणातील गुणवत्ता राखणे एकट्या विद्यापीठ किंवा कुलगुरूंची जबाबदारी नाही. प्राध्यापकांनीही हक्क मागतांना जबाबदारीची जाणीव ठेवली पाहीजे. तसेच सलग्नीत महाविद्यालयात आवश्यक भौतीक सुविधा, प्राचार्य, अध्यापक असावेत. नुसती पदवी देवून चालणार नाही. अशा पद्धतीच्या शिक्षणाने पुर्ण पिढी बरबाद करत आहोत. याकडे गंभीरतेने पहा. असे म्हणत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापनदिनी संशोधन, शैक्षणिक, प्रशासकीय भरीव वाटचालीचा मनोदय कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी अध्यक्षीय समोरोपात व्यक्त केला.

प्रास्ताविक प्र. कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. पुरूषोत्तम देशमुख, मानपत्राचे वाचन प्रा. दासू वैद्य यांनी केले. यावेळी बालसाहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापुरकर, प्रा. डॉ. विलास खंदारे, किशोर शितोळे, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, डॉ. संजय सांभाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला.

रसाळ शिक्षकपण जिवंत ठेवणारे प्राध्यापककुलगुरू डाॅ. येवले म्हणाले, सुधीर रसाळ हे शिक्षकपण जिवंत ठेवणारे ते प्राध्यापक होते. विद्यापीठ जडणघडणीचे ते साक्षीदार राहीले. इथली राजकीय शक्ती प्रबळ असल्याने विद्यापीठ स्थापन झाले. नऊ महाविद्यालयांचे ३ हजार विद्यार्थ्यांचे विद्यापीठ आज ४८० महाविद्यालय, ५२ विभागांपर्यंत विस्तारलेल्या विद्यापीठात साडेचार लाख विद्यार्थी शिकत आहे. संख्यात्मक वाढ होतांना गुणात्मक वाढ खुंटते. चौकटीत काम करतांना गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत आहोत. एकलकोंडा झालेला विद्यार्थ्याला या गर्देतून सोडवण्याचे आव्हान असल्याचे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.

साधनेत आनंद आणि समाधान : बाबा भांडसाधनेला वैचारिक जोड हवी असते ती सुधीर रसाळ सरांनी दिली. ते मराठीची गंगोत्री आहे. अलीकडच्या काळात लोक सत्ता संपत्तीत अडकत आहे. आनंद आणि समाधान हे आवडीच्या साधनेत मिळू शकते. त्याचा होणारा सन्मान प्रेरणा देणारा असतो. राज्य शासनाने उच्च शिक्षण विभागाने युगपुरुषांचे साहित्य खरेदी करावे. युगपुरूषांचे साहित्य अस्तीरतेच्या काळात मानसिक स्वास्थ्य देईल. असे बाल साहित्यिक बाबा भांड म्हणाले.

लवकरच ऑन स्क्रिन व्हॅल्यूएशनअंबेजोगाई येथे २५ एकर, जालन्यात १० एकर विद्यापीठाला मिळालेल्या जागेवर कौशल्य विकासाचे केंद्र उभारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा लवकरच आयोजीत करू. विद्यापीठ गेटच्या परीसरात सौदर्यीकरण, नामांतर शहिद स्मारक, परीक्षा विभागाच्या दुसऱ्या मजल्याचे विस्तारीकरण करत आहोत. तिथे ऑन स्क्रिन व्हॅल्यूएशन सुरू करायचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी २५ कोटींचा निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचे कुलगुरू डाॅ. येवले यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद