शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये

By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST

विजय चोरडिया, जिंतूर पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती.

विजय चोरडिया, जिंतूर
पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती. या एजंटांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व नातेवाईकांना योजनेत सहभागी करुन लाखो रुपयांची माया जमविली.
तालुक्यामध्ये मागील एक वर्षापासून केबीसीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले. ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, डॉक्टर, प्राध्यापक यांनी शेतकरी व त्या त्या भागातील सदन लोकांना या योजनेत ओढले. विशेष म्हणजे, या एजंटांना पाच हजार रुपयांपासून १ कोटी रुपयाच्या बंगल्यापर्यंत कंपनीने आमिष दाखविले होते. सदस्यांच्या साखळीवर ही बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे या लालसेपोटी एजंटांनी स्वत:चे नातेवाईक, मित्रमंडळी यांना या योजनेत ओढले. योजना बंद पडणार आहे, याबाबतची माहिती एजंटांनाही होती. परंतु, आपला लाभ होत असल्याने इतरांना फसविण्यात गैर काय, या उक्तीप्रमाणे एजंटांनी दिसेल त्याला कंपनीत ओढण्याचा प्रयत्न केला. साधारणत: या योजनेत तालुक्यातील १० हजार लाभार्थी गंडविल्या गेले आहेत. लाभार्थ्याची ही रक्कम १० कोटीच्या घरात आहे. तालुक्यामध्ये ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही एजंटाची मोठी साखळी आहे. विशेषत: शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या माध्यमातून ही योजना शहरातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली. जिंतूर शहरातही एक ते दीड कोटी रुपयांची रक्कम योजनेत गुंतविली आहे. गुंतवणूक करीत असताना लाभार्थ्यांनी अवघ्या काही दिवसात रक्कम पाचपट मिळत आहे, या आमिषाला बळी पडून या योजनेची साखळी वाढत गेली. योजनेमध्ये महिला एजंटांची संख्याही मोठी आहे. काही महिलांनी तर घरातील कर्त्या व्यक्तींना अंधारात ठेवून योजनेमध्ये पैसे गुंतविले. ही योजना बंद पडल्याने या महिलांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.
एजंटाच्या मालमत्तेवर टाच
लाभार्थ्यांना योजनेत सहभागी व्हावे, यासाठी एजंटांनी वेगवेगळे आमिष दाखविले. काही एजंटांनी १०० रुपयांच्या बॉन्डवर स्वत:ची मालमत्ता लिहून दिली. काहींनी स्वत:चे धनादेश लिहून दिले. या सर्व प्रकारामुळे लाभार्थी पैशासाठी एजंटाकडे तगादा लावत आहेत. परिणामी तालुक्यातून अनेक एजंट सध्या फरार झाल्याचे समजते. एजंटांनी कमविलेली मालमत्ता ही जप्त करुन लाभार्थ्यांचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सुशिक्षितही गोवल्या गेले
योजनेमध्ये पैसा गुंतविणारे सुशिक्षित व्यक्ती आहेत. या व्यक्तींना भविष्यात कंपनी बुडणार आहे, याची जाणीव होती. परंतु, किमान आपण गुंतविलेले पैसे मिळतील, या आशेवर त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. यात प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक, वकील व कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आज या लोकांवर पश्चाताच करण्याची वेळ आली आहे.