शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करमाड रेल्वे अपघात : ५० वर लोकांची चौकशी; शेतकरी, सरपंच, पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:43 IST

बदनापूर- करमाडदरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताची सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सिकंदराबाद येथील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देरात्री पेट्रोलिंग नाही, गँगमन, की-मॅनची चौकशीसर्वसामान्य नागरिकांनी फिरविली पाठनागरी उड्डयन मंत्रालयाला देणार अहवाल

औरंगाबाद : बदनापूर- करमाडदरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताची सोमवारी औरंगाबादरेल्वेस्टेशनवर सिकंदराबाद येथील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या चौकशीत सायंकाळपर्यंत दोन शेतकरी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस, प्रशासकीय आणि रेल्वे अधिकारी-कर्मचारी, अशा ५० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदविण्यात आले.

रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांनी ही चौकशी केली. त्यासाठी जालना ते औरंगाबाद दरम्यानचे रेल्वे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. यात गेटमन, गँगमन, की मॅन, स्टेशन मास्तर यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र प्रश्नावली तयार करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील आपले जबाब नोंदविले. प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी आणि अपघातानंतरच्या प्रत्येक माहितीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग, रेल्वे सुरक्षा बलाचे आयजी रमेश चंद्रन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  दरम्यान ही चौकशी किमान सात दिवस चालेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रात्री पेट्रोलिंग नाही, गँगमन, की-मॅनची चौकशीउन्हाळ्यात रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर पेट्रोलिंगच करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. नाईट पेट्रोलिंग ही केवळ पावसाळा आणि हिवाळ्यात होते. गँगमन, की-मॅन यांच्याकडून सध्या दिवसा पेट्रोलिंग केली जात असल्याची माहिती स्वत: रेल्वे व्यवस्थापकांनी दिली होती. मात्र, चौकशीसाठी गँगमन, की-मॅन यांना बोलावण्यात आल्याचे दिसून आले.

कंपनीतील लोकांची चौकशीमयत मजूर ज्या कंपनीत कामाला होते, तेथील जबाबदार लोकांचीही चौकशी करण्यात आली. मजुरांशी संबंधित आवश्यक माहिती घेण्यात आल्याचे समजते. 

सर्वसामान्य नागरिकांनी फिरविली पाठमालगाडीच्या अपघातासंबंधी काही माहिती असेल तर नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले  होते. परंतु या घटनेचे साक्षीदार म्हणून परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, दोन शेतकरी, अशा चौघांनीच  जबाब नोंदविले.

नागरी उड्डयन मंत्रालयाला देणार अहवालरेल्वे सुरक्षा आयुक्त हे नागरी उड्डयन मंत्रालयाकडून चौकशी करीत आहेत. चौकशीनंतर त्यांचा अहवाल नागरी उड्डयन मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाला  दिला जाणार आहे. चौकशीचा हा पहिला दिवस आहे. चौकशी आणखी काही दिवस सुरू राहील. मंगळवारपासून नांदेड येथे चौकशी होईल, असे उपिंदरसिंग म्हणाले.

रेल्वे अपघाताची चौकशी १५ दिवस चालणार करमाडजवळील सटाणा येथे  रुळावर झोपलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना मालवाहू रेल्वेने चिरडल्याचा अपघात शुक्रवारी पहाटे घडला. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली असून, समितीने सोमवारी प्राथमिक चौकशी केली. तीन दिवसांत समितीला अहवाल देणे शक्य नाही, त्यामुळे १५ दिवस वाढवून घेण्यात आले आहेत, असे समिती अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले. 

चौकशी समितीने या घटनेप्रकरणी सोमवारी काही जणांना चौकशीसाठी बोलावून प्राथमिक माहिती घेतली,  असे समितीचे अध्यक्ष  डॉ. बाणापुरे यांनी सांगितले. ही न्यायालयीन चौकशी समिती असून, त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, कामगार उपायुक्त हे सदस्य आहेत. समितीचे अध्यक्ष डॉ. बाणापुरे यांनी सांगितले, चौकशीच्या अनुषंगाने सोमवारी कंपनी मालकाला बोलावले होते;  परंतु कंपनी मालक हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना समन्स काढण्यात येणार आहे. 

चौकशी समितीला पडलेले प्रश्नते मजूर कधीपासून कामाला होते. त्यांना वेतन दिले होते काय, त्यांची कंपनी आवारात राहण्याची व्यवस्था केली  होती का, मजुरांची माहिती स्थानिक प्रशासनाला दिला होती काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कंपनी मालकाकडून घेण्यात येणार आहेत, तसेच मोटरमन, स्टेशन मास्तर, कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना काही माहिती विचारण्यात येणार आहे. या घटनेबाबत कुणाला काही आक्षेप असेल, तर तो ७ दिवसांत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे