शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

कळंबला चोराखळीतून पाणी

By admin | Updated: April 14, 2016 01:03 IST

कळंब : शहराला चोराखळी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तीव्र

कळंब : शहराला चोराखळी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कळंबकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा मिराताई चोंदे व नगरसेवकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन २५ टँकरची मागणी केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.मांजरा धरण कोरडेठाक पडल्यानंतर कळंब शहराचा पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. सध्या शहरात दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, जिल्हा प्रशासनाने शहर परिसरातील सहा किमी अंतरातूनच पाणी साठविण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यामुळे परिसरातील स्त्रोत शोधताना पालिकेची दमछाक झाली. या स्त्रोतातूनही मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम टँकरच्या खेपांवर झाला. पर्यायाने नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही कोलमडून शहरवासियांना कधी विकतच्या पाण्यावर तर कधी विंधन विहिरीच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली. शहरात सध्या लोकसहभागातून घेतलेल्या काही विंधन विहिरींवर तसेच काही नागरिकांनीपुढाकार घेऊन उपलब्ध करून दिलेल्या विंधन विहिरीवरून थोडाफार पाणीपुरवठा होतो आहे. नगर परिषद काही ठराविक भागात पाणीपुरवठा करीत असून, दग नगर, कल्पना नगर, बाबाा नगर, पुनर्वसन सावरगाव या भागात नागरिकांची पाण्यासाठी मोठी धावपळ होताना दिसते. शासकीय कार्यालये असलेल्या भागातही पाण्यासाठी नागरिकांनी दिवस-रात्र एक केली आहे. लोकसहभागातून कामे होत असल्याने पालिकाही स्वत:हून काही विंधन विहिरी घेईल, अशी अपेक्षा होती. परंतु, विशेष सभेत मंजूर करून घेतलेल्या १९ विंधन विहरिीबाबत त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. याच अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. यावेळी कळंब शहराचे स्थानिक पाणी स्त्रोत कमी पडत असल्यामुळे चोराखळी येथील तलावातून पाणी द्यावे व २२ हजार लिटर क्षमतेचे २५ टँकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. २५ टँकरच्या रोज दोन खेपा गृहीत धरल्यास कळंब शहर व डिकसळच्या मिळून ४० हजार लोकसंख्येस दर मानसी प्रतीदिन ३० लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा होवू शकतो, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पालिका मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व उपविभागीय अधिकारी यांना चोराखळी येथे जावून स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच अहवाल मिळाल्यानंतर तात्क़ाळ वीस हजार लिटर क्षमतेच्या दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने वीस टँकर मंजूर केले अूसन, यामुळे शहराची पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात नगराध्यक्षा मिराताई चोंदे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, नगरसेवक पांडुरंग कुंभार, श्रीधर भवर, संजय मुंदडा, अतुल कवडे, वनमाला वाघमारे, अतिया सलिम शेख, अनिता लोमटे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख जगन्नाथ बावळे आदींचा समावेश होता.