शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:33 PM

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून वाळूज महानगर परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांशी जलाशयांत पुरेसा साठा झाला नाही. त्यातच या भागात स्थानिक ग्रामपंचायतकीडून पाणी आडवा, पाणी जिरवा, तसेच तलाव खोलीकरणाचे कोणतेच काम झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधीही यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी, साजापूर, तीसगाव, घाणेगाव, गोलवाडीसह पाझर तलाव या गावासह लगतच्या गावचे जलस्त्रोत आहेत. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हे तलावही कोरडेठाक पडले आहेत.

तसेच टेंभापूर प्रकल्पही कोरडा पडला आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने तलावाला वाळवंटाचे स्वरुप आले आहे. त्याचबरोबर बहुतांशी जलस्त्रोतही आटले आहेत. परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून महानगरातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसभर टँकरची वाट बहुनही केवळ ५-६ हंडे पाणी मिळत असल्याने नागरिकांना सर्वस्वी विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई