जेईई- मेन परीक्षेत शहरातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
By Admin | Updated: April 28, 2016 00:19 IST2016-04-27T23:58:06+5:302016-04-28T00:19:32+5:30
औरंगाबाद : अभियांत्रिकीसाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील परीक्षा जेईई- मेनचा निकाल बुधवारी सायं. सीबीएसईद्वारे जाहीर करण्यात आला.

जेईई- मेन परीक्षेत शहरातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
औरंगाबाद : अभियांत्रिकीसाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील परीक्षा जेईई- मेनचा निकाल बुधवारी सायं. सीबीएसईद्वारे जाहीर करण्यात आला. यात शहरातील गुणवंतांनी नेत्रदीपक कामगिरी के ली आहे. मागील काही वर्षांपूर्वी जेईईसारख्या परीक्षांमध्ये शहरातील विद्यार्थी पास होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असायचे. बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी या परीक्षांमध्ये यश संपादित करायचे; परंतु आता जवळपास ५०० विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ३ एप्रिल रोजी सदर परीक्षा घेण्यात आली होती. शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी ठेवण्यात आलेले कट आॅफ गुण पुढीलप्रमाणे- खुला प्रवर्ग : १००, ओबीसी- ७०, एससी- ५२, एसटी- ४८.
नारायणा ग्रुप आॅफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स
नारायणा क्लासेसचा विद्यार्थी सुशांत राठी याने या परीक्षेत ३६० पैकी ३०१ गुण प्राप्त करीत उज्ज्वल कामगिरी के ली आहे. या परीक्षेत ३०० पेक्षा अधिक गुण मिळवणे ही मोठ्या कौतुकाची गोष्ट असल्याचे मत संस्थेचे संचालक डॉ. एम. एफ मल्लिक यांनी व्यक्त केले. संस्थेच्या जवळपास २२० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात संस्थेचे डॉ. एम. एफ. मल्लिक, प्रा. विशाल लदनिया, दत्ता जाधव, प्रा. संतोष कालुंगे, प्रा. दुर्गेश सिंग, प्रा. गोधन सिंग, प्रा. अब्दुल हन्नान, प्रा. सुनील झा, प्रा. प्रदीप शुक्ला, प्रा. संजय सिंग, प्रा. प्रशांत शुक्ला, प्रा. देवदत्त झा, प्रा. अलोककुमार, जिशान अहेमद आदींची उपस्थिती होती.
गायकवाड आयआयटी सेंटर
अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या आयआयटी प्रवेशासाठी जेईई- मेन ही परीक्षा अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजण्यात येते. या टप्प्यावर या सेंटरच्या ५० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या सर्व गुणवंतांचा सत्कार सेंटरचे संचालक प्रा. रामदास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. गायकवाड यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर मेहनत आणि प्राध्यापकांचे अचूक व सुनियोजित मार्गदर्शन याला दिले आहे. प्रा. प्रवीण महाजन, प्रा. राकेश दुबे, प्रा. दीप्ती दुबे, प्रा. गोपाल सिंग आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
गुरुकुल क्लासेस आयआयटी डिव्हिजन
गुरुकुल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जेईई- मेन परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्लासेसचे ८७ विद्यार्थी जेईई- अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले. ऋषिकेश बनकर या विद्यार्थ्याने ३०० गुण पटकावत क्लासमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. संचालक प्रा. प्रदीप गिरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी जेईई- अॅडव्हान्स परीक्षेसाठी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा.अविनाश त्यागी, प्रा. संजय पोळे आदींची उपस्थिती होती.