शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:19 IST

कालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणार; दुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

छत्रपती संभाजीनगर : परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ३ जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. महिनाभरात या कामाच्या निविदा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

जायकवाडी प्रकल्पाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकल्पापासून डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत. डावा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा, तर उजवा कालवा १३० किमी लांबीचा आहे. डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याने या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा अहवाल वर्ष २००५ मध्ये एका समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर शासनास दिला. मात्र, मागील २० वर्षांपासून या दुरुस्तीला मुहूर्त लागला नव्हता. डाव्या कालव्यासह मुख्य आणि उपवितरिकांना जागोजागी भगदाड पडले आहे. झाडेझुडपे उगवलेली आहेत. यामुळे डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ४०टक्के घटली आहे. शिवाय सिंचन क्षमताही घटली आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या छत्रपती संभाजीनगर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासह उपवितरिकांच्या दुरस्तीसाठी शासनाला तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या प्रस्ताव दिला होता. महाराष्ट्र सिंचन सुधारणा योजनेअंतर्गत (एमआयआयपी) जायकवाडी प्रकल्पाचा डाव्या कालव्यासाठी ७३५ कोटी रुपये मंजूर केले. आता केवळ मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल. या कामाच्या तांत्रिक निविदा तयार करण्यात आल्या असून, तपासणीसाठी नाशिक येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. समितीने मंजुरी देताच महिनाभरात निविदा प्रक्रिया होणार असल्याचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी सांगितले.

डाव्या कालव्याची लांबी -- २०८ किलोमीटरसिंचन क्षमता १ लाख ४० हजार हेक्टरकालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणारदुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती२०८ किलोमीटर डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रु. मंजूर केले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. मागील ४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती न झाल्याने वहन क्षमता घटली आहे. सध्या एका आवर्तनासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी दुरुस्तीनंतर १७ ते २० दिवसांपर्यंत येईल.- जयंत गवळी, मुख्य अभियंता, जलसंपदा.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर