शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:19 IST

कालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणार; दुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

छत्रपती संभाजीनगर : परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ३ जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. महिनाभरात या कामाच्या निविदा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

जायकवाडी प्रकल्पाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकल्पापासून डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत. डावा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा, तर उजवा कालवा १३० किमी लांबीचा आहे. डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याने या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा अहवाल वर्ष २००५ मध्ये एका समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर शासनास दिला. मात्र, मागील २० वर्षांपासून या दुरुस्तीला मुहूर्त लागला नव्हता. डाव्या कालव्यासह मुख्य आणि उपवितरिकांना जागोजागी भगदाड पडले आहे. झाडेझुडपे उगवलेली आहेत. यामुळे डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ४०टक्के घटली आहे. शिवाय सिंचन क्षमताही घटली आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या छत्रपती संभाजीनगर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासह उपवितरिकांच्या दुरस्तीसाठी शासनाला तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या प्रस्ताव दिला होता. महाराष्ट्र सिंचन सुधारणा योजनेअंतर्गत (एमआयआयपी) जायकवाडी प्रकल्पाचा डाव्या कालव्यासाठी ७३५ कोटी रुपये मंजूर केले. आता केवळ मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल. या कामाच्या तांत्रिक निविदा तयार करण्यात आल्या असून, तपासणीसाठी नाशिक येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. समितीने मंजुरी देताच महिनाभरात निविदा प्रक्रिया होणार असल्याचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी सांगितले.

डाव्या कालव्याची लांबी -- २०८ किलोमीटरसिंचन क्षमता १ लाख ४० हजार हेक्टरकालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणारदुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती२०८ किलोमीटर डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रु. मंजूर केले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. मागील ४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती न झाल्याने वहन क्षमता घटली आहे. सध्या एका आवर्तनासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी दुरुस्तीनंतर १७ ते २० दिवसांपर्यंत येईल.- जयंत गवळी, मुख्य अभियंता, जलसंपदा.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर