शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाचे सलग चौथ्या वर्षी दरवाजे उघडले; १८ दरवाज्यातून होतोय विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:47 IST

जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

औरंगाबाद: मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे सलग चौथ्यावर्षी दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सायंकाळी सात वाजून २० मिनिटांना सुरुवातीला दोन दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. टप्याटप्प्याने एकूण १८ दरवाने अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वरच्या भागात दमदार पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या सुरुतीपासूनच जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. सध्या ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरु आहे. तसेच आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने आवक वाढत जाणारी आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी आज दुपारी ९० टक्के झाली. तसेच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी , नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. यामुळे आज सायंकाळी धरणातून विसर्ग करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ७:१५ वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातील दोन आणि टप्प्याटप्प्याने तब्बल १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे. गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्क राहणेबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सलग चौथ्यावर्षी करण्यात आला विसर्गमागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाला ४६ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ४६ वर्षांत सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग मागील तीन वर्षांत करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. सध्या जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेक, उजवा कालव्यातून ५०० क्युसेक आणि १८ मुख्य दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस