शहरं
Join us  
Trending Stories
1
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
2
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
3
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
4
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
5
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
6
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
7
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
8
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
9
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
10
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
11
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
12
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
13
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
14
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
15
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
16
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
17
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
18
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
19
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
20
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!

जायकवाडी धरणाचे सलग चौथ्या वर्षी दरवाजे उघडले; १८ दरवाज्यातून होतोय विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:47 IST

जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

औरंगाबाद: मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे सलग चौथ्यावर्षी दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सायंकाळी सात वाजून २० मिनिटांना सुरुवातीला दोन दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. टप्याटप्प्याने एकूण १८ दरवाने अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वरच्या भागात दमदार पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या सुरुतीपासूनच जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. सध्या ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरु आहे. तसेच आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने आवक वाढत जाणारी आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी आज दुपारी ९० टक्के झाली. तसेच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी , नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. यामुळे आज सायंकाळी धरणातून विसर्ग करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ७:१५ वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातील दोन आणि टप्प्याटप्प्याने तब्बल १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे. गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्क राहणेबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सलग चौथ्यावर्षी करण्यात आला विसर्गमागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाला ४६ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ४६ वर्षांत सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग मागील तीन वर्षांत करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. सध्या जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेक, उजवा कालव्यातून ५०० क्युसेक आणि १८ मुख्य दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस