शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

टँकरच्या पाण्यावर जगविलेला हुरडा बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 7:00 PM

दुष्काळ असतानाही हुरडा हिरवागार दिसत आहे, कारण शेतात टँकरने पाणी देऊन तो जगविला जात आहे.

ठळक मुद्देउत्पादन कमी झाल्याने २५० रुपये प्रतिकिलो भाव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ६० ते ७० टक्के उत्पादन घटले 

औरंगाबाद : हिरवागार सुरती गुळभेंडी हुरडा गुलमंडीवर विक्रीसाठी आला आहे. हा हुरडा २५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. दुष्काळ असतानाही हुरडा हिरवागार दिसत आहे, कारण शेतात टँकरने पाणी देऊन तो जगविला जात आहे. असे असतानाही यंदा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत हुरड्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

हिवाळ्याला सुरुवात होताच हुरडा बाजारात विक्रीला येत असतो. गुलाबी थंडीमध्ये तर हुरडा खाण्याची मज्जाच काही औरच असते. गंगापूर तालुक्यातील नरसापूर व सारंगपूर या छोट्याशा गावांचे अर्थकारण याच हुरड्यावर चालते. येथील हुरड्याची चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते. मागील वर्षी पावसामुळे हुरडा खराब झाला होता. यामुळे डिसेंबरच्या अखेरीस ६०० रुपये प्रतिकिलोपर्यंत हुरडा विकला गेला. यंदा पाऊस कमी पडल्याने हुरड्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

व्यापारी अण्णासाहेब शिंदे (नरसापूर) यांनी सांगितले की, दोन्ही गाव मिळून सुमारे ९०० एकर क्षेत्रापैकी ४५० ते ५०० एकरांवर हुरडा घेतला जातो. ज्वारीला पाणी कमी लागते; पण यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे आता शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी विकत आणून हुरडा जगविला आहे. एका एकरवर ८०० किलो हुरडा येत असतो. 

उत्पादनाची परिस्थिती लक्षात घेता यंदा २५० ते ३०० किलो हुरडा हाती येईल. मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरुवातीला दररोज संपूर्ण नरसापूर गावातून २० ते २५ क्विंटल हुरडा विक्रीला येत असे. मात्र, यंदा ३ ते ४ क्विंटल हुरडा विक्रीला येत आहे. हा हुरडा विक्रीला गुलमंडीवर आणला जातो. गुलमंडीवर रविवारी २० ते २५ किलो हुरडा विक्रीला आला होता. विक्रेते राजू शिंदे (नरसापूर) यांनी सांगितले की, आज २५० रुपये किलोने हुरडा विकला जात आहे. मात्र, या भावात मागणी कमी आहे. 

हुरड्याला मागणी वाढणार शेतकरी प्रवीण पारधे (सारंगपूर) यांनी सांगितले की, मागील वर्षी हुरड्याला किलोमागे ६०० रुपये भाव मिळाला होता. यंदा टँकरचे पाणी आणून हुरडा जगविला जात आहे. पुढील महिन्यात मागणी वाढेल तर हुरड्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद