शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

महावीर चौक ते केंब्रिज चौकापर्यंत एकच उड्डाणपूल तयार करता येईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 19:40 IST

Testing of single flyover in Aurangabad : प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल.

ठळक मुद्देतांत्रिक तपासणी होणार असल्याची खासदार इम्तियाज जलील यांची माहिती विमानतळासमोरील उड्डाणपूल अखेर रद्द करण्यात आला आहे मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद आणि अहमदनगरमध्येसुद्धा लांबलचक एकच पूल

औरंगाबाद : जालना रोडवर चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात येणारा उड्डाणपूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी रद्द केला आहे. महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते केंब्रिज शाळेपर्यंत एकच उड्डाणपूल उभारता येईल का, याची तांत्रिक तपासणी एका महिन्यात करावी, असे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. (Is it possible to build a single flyover from Mahavir Chowk to Cambridge Chowk in Aurangabad ?)

गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील जलील यांनी दिला. जालना रोडवर तीन उड्डाणपूल आहेत. प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल. शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत भविष्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल. मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद आणि अहमदनगरमध्येसुद्धा लांबलचक एकच पूल उभारण्यात आला आहे. मग औरंगाबादेत का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एकच उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य सरकार आणि विशेषत: महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation ) सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

ऐतिहासिक बाग बनतेय ‘हिमायत बार’; ३०३ बॅाटल आणि १५० किलो प्लास्टिक रॅपर जमा

लोकसभेतील कामकाज होण्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करताना सत्ताधारी आणि विरोधक यांचा हा गेम प्लॅन असल्याचा आरोप खा. जलील यांनी केला. अनेक गंभीर विषयांवर सरकारला सळो की पळो करून सोडता येईल. पण विरोधकांच्या गोंधळाचा फायदा सरकारला होतोय. एक अधिवेशन चालविण्यासाठी किमान २०० काेटी रुपये खर्च येतो. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा चेंडू केवळ एकमेकांना टोलावण्याचा उद्योग सत्ताधारी आणि विरोधक करीत आहेत. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण द्यावे, हे न्यायालयाने म्हटले आहे. मग त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या सदस्याने नाव कोणी वगळलेराज्य सेवा परीक्षा आयोगावर (एमपीएससी) ज्या सदस्यांची निवड केली त्या यादीत एका तज्ज्ञ मुस्लिम व्यक्तीचाही समावेश होता. त्याचे नाव कोणी वगळले याचा खुलासा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत आम्ही कोणासोबतही जाणार नाही. उलट आमच्यासोबत कोणी आले तर विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय वक्फ समितीची ‘नौटंकी’केंद्रीय वक्फ समितीचे सदस्य शहरात आल्याबद्दल खा. जलील यांना छेडले असता त्यांनी प्रचंड आगपाखड केली. केंद्रीय सदस्यांची ही निव्वळ ‘नौटंकी’असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका