शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महावीर चौक ते केंब्रिज चौकापर्यंत एकच उड्डाणपूल तयार करता येईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 19:40 IST

Testing of single flyover in Aurangabad : प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल.

ठळक मुद्देतांत्रिक तपासणी होणार असल्याची खासदार इम्तियाज जलील यांची माहिती विमानतळासमोरील उड्डाणपूल अखेर रद्द करण्यात आला आहे मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद आणि अहमदनगरमध्येसुद्धा लांबलचक एकच पूल

औरंगाबाद : जालना रोडवर चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात येणारा उड्डाणपूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी रद्द केला आहे. महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते केंब्रिज शाळेपर्यंत एकच उड्डाणपूल उभारता येईल का, याची तांत्रिक तपासणी एका महिन्यात करावी, असे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. (Is it possible to build a single flyover from Mahavir Chowk to Cambridge Chowk in Aurangabad ?)

गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील जलील यांनी दिला. जालना रोडवर तीन उड्डाणपूल आहेत. प्रत्येक पुलाच्या उताराचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन कॉलम उभारून एकच पूल करणे शक्य आहे का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल. शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत भविष्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल. मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद आणि अहमदनगरमध्येसुद्धा लांबलचक एकच पूल उभारण्यात आला आहे. मग औरंगाबादेत का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एकच उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य सरकार आणि विशेषत: महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation ) सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

ऐतिहासिक बाग बनतेय ‘हिमायत बार’; ३०३ बॅाटल आणि १५० किलो प्लास्टिक रॅपर जमा

लोकसभेतील कामकाज होण्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करताना सत्ताधारी आणि विरोधक यांचा हा गेम प्लॅन असल्याचा आरोप खा. जलील यांनी केला. अनेक गंभीर विषयांवर सरकारला सळो की पळो करून सोडता येईल. पण विरोधकांच्या गोंधळाचा फायदा सरकारला होतोय. एक अधिवेशन चालविण्यासाठी किमान २०० काेटी रुपये खर्च येतो. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा चेंडू केवळ एकमेकांना टोलावण्याचा उद्योग सत्ताधारी आणि विरोधक करीत आहेत. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण द्यावे, हे न्यायालयाने म्हटले आहे. मग त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या सदस्याने नाव कोणी वगळलेराज्य सेवा परीक्षा आयोगावर (एमपीएससी) ज्या सदस्यांची निवड केली त्या यादीत एका तज्ज्ञ मुस्लिम व्यक्तीचाही समावेश होता. त्याचे नाव कोणी वगळले याचा खुलासा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत आम्ही कोणासोबतही जाणार नाही. उलट आमच्यासोबत कोणी आले तर विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय वक्फ समितीची ‘नौटंकी’केंद्रीय वक्फ समितीचे सदस्य शहरात आल्याबद्दल खा. जलील यांना छेडले असता त्यांनी प्रचंड आगपाखड केली. केंद्रीय सदस्यांची ही निव्वळ ‘नौटंकी’असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका