शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

By मुजीब देवणीकर | Updated: June 17, 2023 16:25 IST

लिव्हिंग इंडेक्समध्ये देशात ३४ व्या क्रमांकावर, या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने देशभरातील शहरांना रॅकिंग देण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला देशात ३४ वा क्रमांक मिळला. पण खरोखरच हे शहर राहण्यायोग्य आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडायला लागला आहे. शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर वाढतोय. रस्त्यांचा प्रश्न, जलवाहिन्या, केबल, गॅसलाईनसाठी खोदकाम, दिवसभरातून किमान १० वेळेस विद्युत पुरवठा खंडित होतो, आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही, शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडचा खेळखंडोबा, रेल्वे-विमान सेवेचा अभाव दिसून येतो. या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत. ‘लोकमत’ने नागरिकांच्या मनातील दु:ख जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

काय तर स्मार्ट रस्ते!स्मार्ट सिटीने ३१८ कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी कामे सुरू झाली. कामांचे कोणतेच नियाेजन नाही. निकृष्ट दर्जा, ठिकठिकाणी तर खोदकाम करून अक्षरश: कामच सोडून दिले. या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

जलवाहिन्यांसाठी खोदकामनवीन पाणीपुरवठा योजनेत जलवाहिन्या टाकण्यासाठी शहरभर खोदकाम सुरू आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर मातीचे ढिगारे तसेच पडून असतात. अनेक ठिकाणी माती खचते, खड्डे पडतात, नागरिकांना होणाऱ्या त्रासाशी संबंधित यंत्रणेला काहीच देणेघेणे नाही.

गॅस-केबलसाठी खड्डेजी-२० मध्ये रस्त्याच्या कडेला रंगबेरंगी सिमेंटचे गट्टू बसविले. आता अनेक ठिकाणी गॅस लाईन, खासगी कंपनीच्या केबलसाठी गट्टू उखडून फेकून दिल्या जात आहेत. जालना रोडवर हे दृश्य पाहायला मिळते.

विद्युत पुरवठा खंडितजुन महिना सुरू होताच शहरात विजेचा पुरवठा वारंवार खंडित हाेतोय. त्यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत.

आठ दिवसातून एकदा पाणीमहापालिकेने खंडपीठात शपथपत्र दिले की, आम्ही चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी देणार आहोत. मात्र, आजही शहराला सहाव्या, सातव्या दिवशीच पाणी मिळत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाकामानिमित्त नागरिक, विद्यार्थी, गृहिणींना रिक्षाने प्रवास करायचा म्हटले तर किमान १०० रुपये खर्च होतात. स्मार्ट बसेस ९० धावतात. पण बस कधी येईल, हे कोणत्याच स्थानकावर लिहिलेले नाही.

रेल्वे-विमान सेवेचा अभावपर्यटनाची राजधानी असलेल्या शहरात रेल्वे-विमान सेवेचा प्रचंड अभाव आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणारी कनेक्टिव्हिटी नाही. रेल्वेचीही अवस्था तशीच आहे.

रात्री ११ नंतर जेवण नाहीपर्यटनाच्या राजधानीत दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. रात्री ११ नंतर येणाऱ्या पर्यटकांना आवडीच्या ठिकाणी जेवणही मिळणार नाही, अशी अवस्था आहे. ठीक ११ वाजता शहर बंद म्हणजे बंद असा फतवाच पोलिसांनी काढलाय.

कनेक्टिव्हिटी वाढावीछत्रपती संभाजीनगर शहराचे नाव येताच सर्वप्रथम हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न समोर येतो. कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू शहरांनाच विमानसेवा आहे. गोवा, इंदूर, उदयपूर, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता या शहरांसाठीही विमानसेवा सुरू झाली पाहिजे. पर्यटकांना हॉटेलमध्ये सोयीसुविधा मिळतात, पण वेरूळ, अजिंठापर्यंतच्या प्रवासात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची कुठेही सुविधा नाही. वेरुळ-अजिंठा येथेही सोयीसुविधा वाढण्याची गरज आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीelectricityवीजhighwayमहामार्ग