शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

By मुजीब देवणीकर | Updated: June 17, 2023 16:25 IST

लिव्हिंग इंडेक्समध्ये देशात ३४ व्या क्रमांकावर, या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने देशभरातील शहरांना रॅकिंग देण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला देशात ३४ वा क्रमांक मिळला. पण खरोखरच हे शहर राहण्यायोग्य आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडायला लागला आहे. शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर वाढतोय. रस्त्यांचा प्रश्न, जलवाहिन्या, केबल, गॅसलाईनसाठी खोदकाम, दिवसभरातून किमान १० वेळेस विद्युत पुरवठा खंडित होतो, आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही, शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडचा खेळखंडोबा, रेल्वे-विमान सेवेचा अभाव दिसून येतो. या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत. ‘लोकमत’ने नागरिकांच्या मनातील दु:ख जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

काय तर स्मार्ट रस्ते!स्मार्ट सिटीने ३१८ कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी कामे सुरू झाली. कामांचे कोणतेच नियाेजन नाही. निकृष्ट दर्जा, ठिकठिकाणी तर खोदकाम करून अक्षरश: कामच सोडून दिले. या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

जलवाहिन्यांसाठी खोदकामनवीन पाणीपुरवठा योजनेत जलवाहिन्या टाकण्यासाठी शहरभर खोदकाम सुरू आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर मातीचे ढिगारे तसेच पडून असतात. अनेक ठिकाणी माती खचते, खड्डे पडतात, नागरिकांना होणाऱ्या त्रासाशी संबंधित यंत्रणेला काहीच देणेघेणे नाही.

गॅस-केबलसाठी खड्डेजी-२० मध्ये रस्त्याच्या कडेला रंगबेरंगी सिमेंटचे गट्टू बसविले. आता अनेक ठिकाणी गॅस लाईन, खासगी कंपनीच्या केबलसाठी गट्टू उखडून फेकून दिल्या जात आहेत. जालना रोडवर हे दृश्य पाहायला मिळते.

विद्युत पुरवठा खंडितजुन महिना सुरू होताच शहरात विजेचा पुरवठा वारंवार खंडित हाेतोय. त्यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत.

आठ दिवसातून एकदा पाणीमहापालिकेने खंडपीठात शपथपत्र दिले की, आम्ही चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी देणार आहोत. मात्र, आजही शहराला सहाव्या, सातव्या दिवशीच पाणी मिळत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाकामानिमित्त नागरिक, विद्यार्थी, गृहिणींना रिक्षाने प्रवास करायचा म्हटले तर किमान १०० रुपये खर्च होतात. स्मार्ट बसेस ९० धावतात. पण बस कधी येईल, हे कोणत्याच स्थानकावर लिहिलेले नाही.

रेल्वे-विमान सेवेचा अभावपर्यटनाची राजधानी असलेल्या शहरात रेल्वे-विमान सेवेचा प्रचंड अभाव आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणारी कनेक्टिव्हिटी नाही. रेल्वेचीही अवस्था तशीच आहे.

रात्री ११ नंतर जेवण नाहीपर्यटनाच्या राजधानीत दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. रात्री ११ नंतर येणाऱ्या पर्यटकांना आवडीच्या ठिकाणी जेवणही मिळणार नाही, अशी अवस्था आहे. ठीक ११ वाजता शहर बंद म्हणजे बंद असा फतवाच पोलिसांनी काढलाय.

कनेक्टिव्हिटी वाढावीछत्रपती संभाजीनगर शहराचे नाव येताच सर्वप्रथम हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न समोर येतो. कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू शहरांनाच विमानसेवा आहे. गोवा, इंदूर, उदयपूर, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता या शहरांसाठीही विमानसेवा सुरू झाली पाहिजे. पर्यटकांना हॉटेलमध्ये सोयीसुविधा मिळतात, पण वेरूळ, अजिंठापर्यंतच्या प्रवासात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची कुठेही सुविधा नाही. वेरुळ-अजिंठा येथेही सोयीसुविधा वाढण्याची गरज आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीelectricityवीजhighwayमहामार्ग